कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

मुंबई इंडियन्सचा आज लखनौशी मुकाबला

06:10 AM Apr 04, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/लखनौ

Advertisement

इंडियन प्रीमियर लीगमध्ये आज शुक्रवारी मुंबई इंडियन्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात सामना होणार असून यावेळी भारतीय क्रिकेटमधील दोन दिग्गज खेळाडू रोहित शर्मा आणि रिषभ पंत हे आपल्या खराब फॉर्ममधून बाहेर पडण्याची आशा बाळगून मैदानात उतरतील. पाच वेळचे विजेते मुंबई इंडियन्स या हंगामात आतापर्यंत फारशी चांगली कामगिरी करू शकलेले नाहीत. तीन सामन्यांतून त्यांनी फक्त दोन गुण मिळवले आहेत. भारतीय कर्णधार रोहितच्या फलंदाजीच्या फॉर्ममुळे मुंबई संघाचे व्यवस्थापन अडचणीत आले आहे. एलएसजी कर्णधार पंतचीही हीच परिस्थिती आहे. दोन्ही संघ तीन सामन्यांतून प्रत्येकी एका विजयासह जवळजवळ सारख्याच स्थानावर असल्याने आजच्या परिस्थितीत कोण चांगले खेळतो यावर सारे काही अवलंबून राहणार आहे.

Advertisement

क्युरेटर यजमान संघांना अनुकूल अशा खेळपट्ट्या बनवत नसल्याने काही संघांचे प्रशिक्षक आणि खेळाडूंमध्ये निराशा निर्माण झाली आहे. पॉवर प्ले षटकांत फलंदाजी किंवा गोलंदाजीत चांगली सुऊवात करणारा संघच चांगली झेप घेऊ शकतो. दुखापतीमुळे मुंबईचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह खेळू शकत नसून त्याची अनुपस्थिती त्यांना जाणवत आहे. व्यवस्थापनाने त्याच्या पुनरागमनाबद्दल मौन बाळगल्याने हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखालील संघाची निराशा आणखी वाढली आहे. तथापि, मुंबईला तऊण डावखुरा गोलंदाज अश्वनी कुमारच्या वेगवान गोलंदाजीमुळे यश मिळाले आहे. त्याने 31 मार्च रोजी घरच्या मैदानावर नोंदविल्या गेलेल्या गतविजेत्या कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या विजयात तीन षटकांत 4-24 अशी उत्कृष्ट कामगिरी केली. त्याच्याबद्दल आताच अपेक्षा बाळगणे योग्य ठरणार नसले, तरी या 23 वर्षीय पंजाबच्या वेगवान गोलंदाजामुळे मुंबईला आशेचा किरण मिळाला आहे. मुंबईला आशा असेल की, अश्वनी हा एका सामन्यातील चमत्कार ठरणार नाही.

वानखेडेवर केकेआरविऊद्ध मुंबईने अखेर प्रभावी कामगिरी केली आणि दक्षिण आफ्रिकेचा यष्टीरक्षक रायन रिकेल्टनने त्यांना कमी धावसंख्येच्या पाठलागात विजय मिळवून दिला. रोहित आणि ‘मिस्टर 360 डिग्री’ सूर्यकुमार यादव यांना मोठी भूमिका बजवावी लागणार असून त्यांची फलंदाजी फळी लांबलचक नाही, परंतु त्यांच्याकडे संथ आणि वेगवान गोलंदाजांचा एक चांगला विभाग आहे आणि ते प्रभावी कामगिरी करू शकतात. मुंबईच्या मागे सहाव्या स्थानावर असलेल्या लखनौ सुपर जायंट्सने विशाखापट्टणम येथे झालेल्या आयपीएलच्या पहिल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सविऊद्धच्या एका गड्याने झालेल्या निराशाजनक पराभवानंतर खरोखरच फारशी प्रगती केलेली नाही.

त्यांच्या बाबतीत वेस्ट इंडिजचा निकोलस पूरन उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे आणि दोन अर्धशतकांसह तीन सामन्यांमध्ये 189 धावा त्याने काढलेल्या आहेत. परंतु त्याच्या कामगिरीचा परिणाम ऑस्ट्रेलियन मिशेल मार्श वगळता एलएसजीच्या इतर फलंदाजांवर झालेला नाही. मार्शने या स्पर्धेत आतापर्यंत दोन अर्धशतके झळकावली आहेत. त्यांच्या बऱ्याचशा अडचणी या शार्दुल ठाकुर आणि रवी बिश्नोई यांच्या नेतृत्वाखालील गोलंदाजी आणि त्यांचा कर्णधार पंतचा फलंदाजीतील खराब फॉर्म यामुळे निर्माण झालेल्या आहेत. भारताच्या चॅम्पियन्स ट्रॉफी मोहिमेदरम्यान रिषभला संघात स्थान न मिळून के. एल. राहुलने यष्टीरक्षण सांभाळले होते. पंतचा फॉर्म आगामी व्यस्त हंगामाचा विचार करता चिंतेचा विषय आहे. आतापर्यंतच्या तीन सामन्यांमध्ये त्याने 0, 15 आणि 2 अशी कामगिरी केलेली असून एलएसजी कर्णधार स्पष्टपणे संघर्ष करत आहे. पण एक चांगला डाव हे सर्व बदलू शकतो.

लखनौ सुपर जायंट्स् : रिषभ पंत (कर्णधार), अब्दुल समद, आकाश दीप, आकाश सिंग, आवेश खान, आयुष बडोनी, मॅथ्यू ब्रीट्झके, युवराज चौधरी, राजवर्धन हंगरगेकर, हिम्मत सिंग, शामर जोसेफ, आर्यन जुयाल, अर्शिन कुलकर्णी, एडन मार्करम, मिचेल मार्श, डेव्हिड मिलर, निकोलस पूरन, प्रिन्स यादव, दिग्वेश राठी, रवी बिश्नोई, शाहबाज अहमद, मणिमारन सिद्धार्थ, शार्दुल ठाकूर, मयंक यादव.

मुंबई इंडियन्स : हार्दिक पंड्या (कर्णधार), अश्वनी कुमार, राज बावा, कॉर्बिन बॉश, ट्रेंट बोल्ट, जसप्रीत बुमराह, दीपक चाहर, विल जॅक्स, बेव्हन जेकब्स, रॉबिन मिन्झ, मुजीब उर रहमान, नमन धीर, विघ्नेश पुथूर, सत्यनारायण राजू, रायन रिकल्टन, मिचेल सँटनर, कर्ण शर्मा, रोहित शर्मा, कृष्णन श्रीजीथ, अर्जुन तेंडुलकर, तिलक वर्मा, रीस टोपले, सूर्यकुमार यादव.

सामन्याची वेळ : संध्याकाळी 7.30 वा.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article