म्हादईप्रश्नी सुनावणी तिसऱ्या दिवशीही टळली
11:40 AM Dec 07, 2023 IST
|
Tarun Bharat Portal
Advertisement
पणजी : म्हादई नदीच्या पाण्याच्या वाटपावर आयोगाने दिलेल्या निवाड्यास गोव्याने दिलेल्या आव्हान अर्जावर सर्वोच्च न्यायालयात काल बुधवारी सुनावणी होईल, अशी शक्यता होती, ती फोल ठरली. सुनावणी झाली नसल्याने सरकारी वकिलांच्या पथकाला निराश व्हावे लागले. सदर सुनावणी आता आज गुऊवारी होण्याची आशा व्यक्त केली जात आहे. म्हादईप्रश्नी 29 व 30 नोव्हेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार होती पण, त्या दोन्ही दिवशी याचिका सुनावणीस आलीच नाही. त्यामुळे निदान या आठवड्यात तरी याचिका सुनावणीस येईल अशी आशा होती. गोव्याच्या याचिकेचा क्रमांक-106 होता, मात्र संध्याकाळी कामकाज संपेपर्यंत क्रमांक-103ची सुनावणी चालू राहिल्याने आता आज सकाळी गोव्याचा क्रम लागण्याची आशा असल्याचे मत गोव्याचे अॅडव्होकेट जनरल देविदास पांगम यांनी ‘तऊण भारत’ शी बोलताना व्यक्त केले.
Advertisement
Advertisement
Advertisement
Next Article