महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

पावसाची शक्यतेमुळे उपाययोजना

06:40 AM Jun 01, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

आसाममध्ये येत्या काही दिवसांमध्ये जोरदार पाऊस होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. मॉन्सून ईशान्य भारतात पोहचला असल्याने मुसळधार पाऊस होणे शक्य आहे. अशा स्थितीत 4 जूनला होणाऱ्या मतगणनेत कोणत्याही प्रकारचा व्यत्यय येऊ नये, म्हणून आसाममध्ये विषेश उपाययोजना करण्यात आल्या आहेत. ही माहिती मुख्य निवडणूक अधिकारी अनुराग गोयल यांनी दिली.

Advertisement

पावसामुळे वीज पुरवठा खंडित होण्याची शक्यता गृहित धरुन जनरेटर्स आणि इन्व्हर्टर्स मतगणना केंद्रांना पुरविण्यात आले आहेत. तसेच वीजपुरवठा खंडित झाल्यास पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे. पर्यायी इंटरनेट व्यवस्थाही केलेली असल्याने मतगणना प्रारंभापासून शेवटपर्यंत सुरळीत पार पडेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आवश्यकतेनुसार इतर उपाययोजना करण्यात येतील. पर्यायी व्यवस्थांची उपलब्धता सुनिश्चित करण्यात येईल, असे प्रतिपादन त्यांनी केले.

Advertisement

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article