कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

मराठीला राजभाषेचा दर्जा मिळायलाच हवा

12:42 PM Mar 04, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

पर्वरी येथे मराठीप्रेमींच्या बैठकीत निर्धार : मराठीसाठी निणार्यक लढ्याची आखणी, मार्चच्या अखेरीस होणार कार्यकर्ता मेळावा 

Advertisement

पणजी : शासकीय पातळीवरुन मराठीवर सातत्याने होणारा अन्याय कायमस्वरूपी दूर करायचा असेल तर मराठीला तिच्या हक्काचा राजभाषेचा दर्जाच मिळायला हवा. त्यासाठी आवश्यक निर्णायक लढ्याची रूपरेषा ठरवण्यासाठी पर्वरी येथील गोमंतक मराठी अकादमीच्या कार्यालयात मराठीला राजभाषेचा दर्जा प्राप्त व्हावा यासाठी गेली अनेक दशके प्रयत्नशील असलेले गो. रा. ढवळीकर यांच्या अध्यक्षतेखाली मराठी राजभाषा व्हावी अशी तीव्र इच्छा असलेल्या निवडक कार्यकर्त्यांची बैठक होऊन त्यात मराठी राजभाषेसाठी निर्धार करण्यात आला.

Advertisement

सामाजिक, शैक्षणिक तथा सांस्कृतिक क्षेत्रात गेली अनेक वर्षे कार्य करणारे कुशल संघटक प्राचार्य सुभाष भास्कर वेलिंगकर यांनी बोलावलेल्या या बैठकीस गोमंतक मराठी अकादमीचे अध्यक्ष प्रदीप घाडी आमोणकर, ‘मराठी असे आमुची मायबोली’चे निमंत्रक प्रकाश भगत, ज्येष्ठ पत्रकार गुऊदास सावळ हे यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते. या चळवळीचे राज्य निमंत्रक म्हणून प्राचार्य सुभाष वेलिंगकर यांची टाळ्यांच्या गजरात एकमताने निवड करण्यात आला

गो. रा. ढवळीकर यांनी मराठी राजभाषा व्हावी म्हणून गेली सुमारे चाळीस वर्षे चालू असलेल्या लढ्यातील महत्वाच्या घटना विषद केल्या. महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाने मराठीची कास सोडल्याने आज मराठी राजभाषेसाठी याचना करण्याची पाळी आली असल्याचे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले. कै. विष्णू वाघ आणि नरेश सावळ यांच्यानंतर विधानसभेत मराठीसाठी आवाज उठवणारा एकही आमदार नसल्याची खंतही त्यानी व्यक्त केली.

राजभाषा हा मराठीचा हक्क : वेलिंगकर

बैठकीचे निमंत्रक प्राचार्य सुभाष वेलिंगकर यानी राजभाषा आंदोलनाच्यावेळी करण्यात आलेल्या संघर्षाची माहिती देऊन, त्यावेळी हिंदूंच्या मतांवर निवडून असलेल्या राजकारण्यांनी कशाप्रकारे कच खाल्ली या विषयी सविस्तर कथन केले. कोंकणीला रोमी लिपी देणे अराष्ट्रीय असल्याचे सांगून त्या मोबदल्यात मराठीला राजभाषेचा दर्जा देण्याचा सौदा ही मराठीशी केलेली प्रतारणा ठरेल, असेही ते पुढे म्हणाले. कोंकणीशी आमचे वैर नसून राजभाषा दर्जा हा मराठीचा हक्क असल्याचे त्यानी सांगितले.

गोमंतक मराठी अकादमीचे पूर्ण सहकार्य : आमोणकर

प्रदीप घाडी आमोणकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. मराठी राजभाषा आंदोलनासाठी गोमंतक मराठी अकादमी सर्वतोपरी मदत करील,अशी ग्वाही त्यानी यावेळी बोलताना दिली.

राजभाषेच्या दर्जानंतरच लढा थांबेल : सावळ

गुऊदास सावळ यानी ऋणनिर्देश करताना कुशल संघटक प्राचार्य सुभाष वेलिंगकर यांच्या नेतृत्वाखाली सुरू होणारा हा लढा निर्णायक लढा असून मराठीला राजभाषेचा दर्जा मिळाल्यानंतरच थांबेल,असे सांगितले. या विषयासंदर्भात पूर्ण राज्यात जागृती करण्याचा व मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात राज्यातील प्रमुख कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्याचे यावेळी ठरविण्यात आले. निवडक कार्यकर्त्यांच्या या बैठकीस डॉ. अनुजा जोशी, शिक्षणतज्ञ गोविंद देव, मराठी राजभाषा आंदोलनातील ज्येष्ठ कार्यकर्त्या अनुराधा मोघे, शिक्षण क्षेत्रातील महिला कार्यकर्त्या रोशन सामंत, साहित्यिक तथा निवृत्त प्राचार्य गजानन मांद्रेकर, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सूर्यकांत गावस, नितीन फळदेसाई, परेश पणशीकर, प्रवीण नेसवणकर, प्राचार्य संदीप पाळणी, विनय नाईक, संतोष धारगळकर, सत्तरीतील युवा कार्यकर्ते विजय नाईक, सामाजिक कार्यकर्ते अॅड. शिवाजी देसाई, गोमंतक मराठी परिषदेचे अध्यक्ष डॉ. मधु घोडकिरेकर, म.रा.प्र.स.चे युवा कार्यकर्ते मच्छिंद्र च्यारी, प्रा.नारायण महाले, प्रमोद कारापुरकर, रामदास सावईवेरेकर, नरेंद्र आजगावकर यांचा समावेश होता.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article