For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

केवळ 100 रु. दरवाढ केल्याने कुमारस्वामी असमाधानी

11:00 AM Nov 10, 2025 IST | Tarun Bharat Portal
केवळ 100 रु  दरवाढ केल्याने कुमारस्वामी असमाधानी
Advertisement

बेंगळूर : राज्य सरकारने ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी उसाच्या दरात केवळ 100 रुपयांची वाढ केल्याबद्दल केंद्रीय अवजड उद्योग मंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी नाराजी व्यक्त केली आहे. केंद्र सरकारने यापूर्वीच उसासाठी प्रतिटन 3,550 रुपये एफआरपी दर निश्चित केला आहे. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी किमान 3,500 रुपये प्रतिटन दर देण्याची मागणी केली होती. परंतु राज्य सरकारने केवळ 3,300 रुपये दर निश्चित करून ऊस उत्पादकांवर अन्याय केला आहे. मुख्यमंत्र्यांनी केंद्र सरकारवर अनावश्यक आक्षेप घेत असून शेतकऱ्यांमध्ये गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. ऊस उत्पादकांनी सरकारकडून होत असलेली फसवणूक समजून घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.

Advertisement

Advertisement
Tags :

.