कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

जेएसडब्ल्यू समूह करणार 60 हजार कोटींची गुंतवणूक

07:00 AM Apr 04, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

बस, ट्रक्सची करणार निर्मिती: महाराष्ट्रात कारखाना

Advertisement

वृत्तसंस्था/नवी दिल्ली

Advertisement

अब्जाधिश सज्जन जिंदल यांच्या नेतृत्वातील कंपनी जेएसडब्ल्यू समूह चालू आर्थिक वर्षात 60 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची योजना बनवत आहे. यायोगे कंपनी आपला व्यवसाय मजबुत करतानाच विस्तारही करणार आहे. सदरच्या गुंतवणूकीअंतर्गत 636 एकर जमिनीवर पसरलेल्या औरंगाबाद येथील कारखान्यात वर्षाला 10 हजार इलेक्ट्रिक बस आणि 5 हजार इलेक्ट्रिक ट्रकची निर्मिती केली जाणार आहे. वरील रक्कमेपैकी 15 हजार कोटी रुपये हे इलेक्ट्रिक वाहनांच्या व्यवसायासाठी राखीव ठेवण्यात आले आहेत.

ग्रीनटेकचा होणार कारखाना

समूहातील कंपनी जेएसडब्ल्यू ग्रीनटेक लिमिटेड महाराष्ट्रात औरंगाबाद येथे नवा कारखाना बांधणार आहे. ज्या ठिकाणी इलेक्ट्रिक बस आणि टॅक्सची निर्मिती केली जाणार आहे. इलेक्ट्रिक वाहनाच्या व्यवसायासाठी कंपनी चीनमधील भागीदाराचा शोध घेत असल्याचे समजते. सुरुवातीच्या काळात आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी 1487 कोटी रुपयांचे कर्ज घेतले जाणार असल्याचे सांगितले जात आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article