महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

ब्रह्मप्राप्तीनेच इंद्रियजय पूर्णत: साधला जातो

06:40 AM Jun 19, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

अध्याय पहिला

Advertisement

बाप्पा राजाला म्हणाले, स्थिरबुद्धि मनुष्य विवेकाने इंद्रियांवर नियंत्रण करत असतो. मनाला त्यानं ईश्वराच्या अनुसंधानात गुंतवून टाकलेले असते. ईश्वरस्मरणात मन स्थिर होण्यासाठी तोंडाने नामस्मरण करून कानांनी तो ते ऐकत असतो. ह्यातून काही काळ मनुष्य विषयत्याग करण्यात यशस्वी होतो पण विषयांचे विचार त्याच्या मनातून जाता जात नसल्याने विषयाचे सेवन केल्याशिवाय तो गप्प बसू शकत नाही.

Advertisement

ज्याला इंद्रियजय साधायचा आहे त्यानं स्वत:ला अध्यात्माच्या अभ्यासात, ब्रह्मप्राप्तीच्या प्रयत्नात गुंतवून घ्यावं. ब्रह्मप्राप्तीनेच इंद्रियजय पूर्णत: साधला जातो. इतर कोणत्याही उपायाने साधलेला इंद्रियजय फार काळ टिकत नाही. अनेक जन्म इंद्रिये दाखवत असलेल्या प्रलोभनांना तो बळी पडत असतो. सध्या आपण अभ्यासत असलेल्या विपश्चिद्यतते भूप स्थितिमास्थाय योगिन । मन्थयित्वेन्द्रियाण्यस्य हरन्ति बलतो मन ।।57।। ह्या श्लोकात असे सांगितले आहे की, विद्वान मनुष्य योगीजनांच्या पावलावर पाऊल टाकून इंद्रियजय साधण्याचा प्रयत्न करत असतो पण या इंद्रियांचे सामर्थ्य असे आहे की, ती खळखळ करून जबरदस्तीने त्याचे मन विषयांकडे ओढतात. माणसाने कितीही ठरवले आणि स्वत:ला निरनिराळ्या उपायांनी विषयोपभोगांपासून स्वत:ला लांब ठेवायचा प्रयत्न केला तरी इंद्रिये तो सहजी हाणून पाडतात व त्याच्यावर बळजबरी करून त्याला विषयांकडे ओढतात. ह्याबद्दल सांगायचं झालं तर कैवल्यसाक्षात्काराच्या अगदी जवळ पोहोचलेले साधकही विषयांच्या उपभोगाच्या आकर्षणापायी खाली खेचले गेलेले आहेत. खरं म्हणजे हे असं होऊ शकतं ह्याची त्यांना पूर्वकल्पना असते परंतु आपण आता ज्ञानी झालेलो आहोत, आपण सर्व परिस्थिती चांगल्या पद्धतीने हाताळू शकतो ह्या खोट्या आत्मविश्वासापायी त्यांचा बळी जातो. उदाहरणच द्यायचं झालं तर विश्वामित्रांचं देता येईल. त्यांच्यासारखे भले तपस्वीसुद्धा मेनकेच्या आकर्षणाला बळी पडले.

विषयांपासून माणसाची सुटका होण्याच्या दृष्टीने बाप्पा त्यावर सविस्तर मार्गदर्शन करत आहेत. त्यांना माहिती आहे की, काहीतरी करून माणसाचे विषयांचे आकर्षण कमी झाले तरच त्याच्याहातून पुढे साधना घडेल. ब्रह्मप्राप्ती झाली तर विषयांपासून सुटका होईल हे खरे पण ती करून घेण्यात अनेक अडथळे येतात आणि स्वबळावर मनुष्य ते पार करू शकत नाही. म्हणून पुढील श्लोकात बाप्पा सांगतात की, मला शरण ये.

युक्तस्तानि वशे कृत्वा सर्वदा मत्परो भवेत् ।

संयतानीन्द्रियाणीह यस्यासौ कृतधीर्मत ।।58।।

अर्थ- योग्याने इंद्रियांना ताब्यात ठेवून सर्वदा मत्पर म्हणजे माझ्या ठिकाणी चित्त असलेला व्हावे. ज्याची इंद्रिये नियंत्रित असतात त्याला या लोकी कृतबुद्धि अथवा स्थितबुद्धि म्हणतात.

विवरण- बाप्पा राजाला म्हणतात, तुला स्वत:च्याने विषयांवर नियंत्रण साधणार नाही. कितीही प्रयत्न केलास तरी तुला विषयोपभोगांचे आकर्षण वाटणार आणि ते तुला मोहात पाडणार. हे टाळण्यासाठी मी तुला एक उपाय सांगतो तो म्हणजे सदैव माझं स्मरण करून मला चित्तात साठवून ठेव. असं केलंस की, त्यात काय आनंद आहे ते तुला कळेल आणि तुझ्या लक्षात येईल की, विषयोपभोगांपासून मिळणाऱ्या क्षणिक आनंदापेक्षा हा चिरकाल टिकणारा आनंद लाखमोलाचा आहे. माणसाला जे हवंहवंसं वाटतं त्यापेक्षा काही मोठ्ठ मिळालं की, कनिष्ठ गोष्टींचा तो स्वत:हून त्याग करतो. माझ्यात चित्त गुंतवल्यावर मिळणाऱ्या आनंदाचा अनुभव घेतलास की, विषयोपभोगांपासून मिळणाऱ्या आनंदाकडं तुझं आपोआपच दुर्लक्ष होईल. परिणामी तुझी इंद्रिये तुझ्या नियंत्रणात राहतील अशा इंद्रियनियंत्रण साधलेल्या साधकाला कृतबुद्धि किंवा स्थिरबुद्धि असे म्हणतात.

क्रमश:

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article