For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘युएन’मध्ये भारताने पाकिस्तानला फटकारले

07:00 AM Jun 28, 2024 IST | Tarun Bharat Portal
‘युएन’मध्ये भारताने पाकिस्तानला फटकारले
Advertisement

वृत्तसंस्था /नवी दिल्ली

Advertisement

भारताने पुन्हा एकदा संयुक्त राष्ट्रात पाकिस्तानला फटकारले आहे. संयुक्त राष्ट्र परिषदेमध्ये पाकिस्तानने जम्मू-काश्मीरचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर त्याला प्रत्युत्तर देताना भारताने पाकिस्तानच्या निराधार टिप्पणीवर टीका केली. त्यांनी या टिप्पण्या राजकीय हेतूने प्रेरित आणि निराधार असल्याचे म्हटले आहे. आपल्या देशातील गंभीर चुकांबाबत लक्ष विचलित करण्याचा पाकिस्तानचा हा आणखी एक नेहमीचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले. संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेतील पाकिस्तानच्या प्रतिनिधीने जम्मू-काश्मीरचा उल्लेख केल्यानंतर भारताची टिप्पणी आली आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.