कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

गिरी, सुकूर, सांगोल्डा येथील शेतजमीन त्वरित पूर्ववत करा

12:40 PM Apr 02, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

उच्च न्यायालयाचा सरकारला आदेश : शेतजमिनीत टाकलाय मातीचा भराव

Advertisement

पणजी : मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने प्रशासकीय अधिकाऱ्यांना तीन महिन्यांच्या मुदतीत गिरी-म्हापसा येथील भातशेती पुनर्संचयित करण्याचे निर्देश दिले आहेत. या आदेशाचे पालन न केल्यास ते अवज्ञा मानले जाईल, असे हे प्रकरण न्यायालयाच्या निदर्शनास आणणारे अॅड. ओम डिकॉस्ता यांनी सांगितले. सुकूर, गिरी आणि सांगोल्डा या गावांमधील सखल शेतजमिनीत बेकायदेशीरपणे भराव टाकून त्या जमिनी भरल्या जात असल्याच्या विरोधात दाखल केलेल्या जनहित याचिकेतून हे प्रकरण उघडकीस आले आहे.

Advertisement

याचिकेत गोवा उच्च न्यायालयाने दिलेल्या मागील आदेशानुसार दीर्घकाळ प्रलंबित असलेले बांधकाम पाडणे आणि जमीन पुनर्संचयित करण्याची मागणी करण्यात आली आहे. यात आश्चर्य म्हणजे न्यायालयाच्या निर्देशानंतरही गोवा सरकारने वारंवार मुदतवाढ मागितल्याने आदेशाची अंमलबजावणी पुढे ढकलण्यात आली आहे. अॅड. ओम डिकॉस्ता यांनी माहिती देताना सांगितले की, पुनर्संचयित करण्याचे काम करण्यात अधिकारी अपयशी ठरल्यास त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात. कारण न्यायालयाने स्पष्टपणे म्हटले आहे की, काम पूर्ण न केल्यास न्यायालयाचा अवमान मानला जाईल. या आदेशाचे उद्दिष्ट शेतजमिनींचे संरक्षण करणे आणि उच्च न्यायालयाच्या सूचनांचे अधिक विलंब न करता पालन करणे आहे, असेही ते म्हणाले.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article