महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

अवकाळीच्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करा! आ. विक्रमसिंह सावंत यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

08:27 PM Nov 29, 2023 IST | Abhijeet Khandekar
MLA Vikram Singh Sawant
Advertisement

जत प्रतिनिधी

जत तालुक्यात मंगळवारी झालेल्या वादळी वारा व अवकाळी पावसाने मोठे नुकसान झाले आहे. अवकाळी पावसामुळे झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याचे निर्देश जतचे आमदार विक्रमसिंह सावंत यांनी तहसिलदार जीवन बनसोडे यांना दिले आहेत. त्यानुसार जत तालुक्यातील शेतकऱ्यांनी तलाठी व कृषी अधिकारी यांच्याकडून पंचनामे करुन घ्यावेत, असे आवाहन आ. विक्रमसिंह सावंत यांनी केले आहे.

Advertisement

आधीच दुष्काळाच्या उंबरठ्यावर असणार्‍या जत तालुक्यातील शेतकर्‍यांच्या या अवकाळी मुळे जखमा आणखी तीव्र झाल्या आहेत. दरम्यान, गारपीट आणि अवकाळी पावसामुळे शेती पिक, फळ बागा आणि दगावलेल्या जनावरांचे तातडीने पंचनामे होणे गरजेचे आहे. येळवी, खैराव, माडग्याळ परिसरातील लाखो रुपयांचे पिकांचे नुकसान झाले आहे. तसेच खैराव येथे झाड कोसळून म्हैस दगावली आहे. या गावातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी तलाठी व कृषी विभागातील अधिकारी यांना तात्काळ संपर्क साधून पंचनामे करून घ्यावेत. नुकसाभरपाई देण्यासंदर्भात हिवाळी अधिवेशनात आपण स्वतः आवाज उठविणार असल्याचे आ. सावंत यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

Advertisement

Advertisement
Tags :
damage weatherimmediate assessmentVikram Singh Sawant instructions
Next Article