महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

ग्रामीण जनतेसाठी आरोग्य विभाग अलर्ट

11:16 AM Sep 10, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

ग्रामपंचायत स्तरावर मोफत तपासणी : आरोग्य खात्याच्या बैठकीत निर्णय

Advertisement

बेळगाव : ग्रामीण जनतेलाही विविध आजारांना सामोरे जावे लागत आहे. ग्रामीण जनतेच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी मोफत शिबिरे आयोजित केली जाणार आहेत. याबाबत सोमवारी ग्रामविकास आणि पंचायतराज खाते, महिला व बालकल्याण खाते व आरोग्य कुटुंब कल्याण खात्याची संयुक्त बैठक झाली. या बैठकीत ‘गावचे आरोग्य’ या समन्वय पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले.या शिबिरामध्ये नागरिकांची बीपी, शुगर, अॅनिमिया आदी रुग्णांशी संबंधित नागरिकांची तपासणी केली जाणार आहे. अलीकडे बीपी, शुगर रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. त्यामुळे अनेकांना अचानक मृत्यूला सामोरे जावे लागत आहे. यासाठी आरोग्य व कुटुंब कल्याण खाते अधिक अलर्ट झाले आहे. ग्रामपंचायत स्तरावर जनजागृती करून रुग्णांची मोफत तपासणी केली जाणार आहे.

Advertisement

आरोग्याबाबत कार्यक्रमांचे नियोजन आणि अंमलबजावणी करण्यासाठी ग्रामपंचायत पातळीवर टास्क फोर्स समितीची निर्मिती करण्यात आली आहे. याअंतर्गत हा उपक्रम राबविला जाणार आहे. आरोग्य खात्याचे अधिकारी, पीडीओ, अध्यक्ष, सदस्य यांना सामावून घेऊन ही शिबिरे आयोजित केली जाणार आहेत, अशी माहिती डॉ. चांदनी देवडी यांनी दिली. ग्रामीण भागातील शाळा, मंदिर,  मुदाय भवन आणि इतर ठिकाणी आरोग्य तपासणी शिबिरे आयोजित करून आरोग्याबाबत जनजागृती केली जाणार आहे. त्याबरोबरच बीपी, शुगर, टीबी रुग्णांना योग्य सल्लाही दिला जाणार आहे, अशी माहितीही कार्यक्रमादरम्यान देण्यात आली. याप्रसंगी महिला व बाल कल्याण खात्याचे सहसंचालक नागराज आर., आरोग्य खात्याच्या तालुका प्रमुख डॉ. चांदनी देवडी, डॉ. भारती, डॉ. निंगम्मा यासह तालुका मुख्य कार्यकारी अधिकारी आणि इतर तालुक्यातील अधिकारी उपस्थित होते.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article