कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

खालच्या फळीतील फलंदाजांकडून कठोर परिश्रम : प्रसिद्ध कृष्णा

06:18 AM Jun 29, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/ लंडन

Advertisement

इंग्लंडविऊद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात अपयशी ठरलेल्या भारताच्या खालच्या फळीतील फलंदाजांनी पुढील आठवड्यात बर्मिंगहॅममध्ये होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी चांगल्या तयारी करण्यावर लक्ष केंद्रीत केले असून ते जाळ्यात कठोर परिश्रम करत आहेत, असे गोलंदाज प्रसिद्ध कृष्णाने सांगितले आहे.

Advertisement

भारताच्या खालच्या फळीने दोन्ही डावांत कोणताही प्रतिकार न करता शरणागती पत्करली, जी अंतिम निकालात निर्णायक ठरली. पाहुण्या संघाने पहिल्या डावात 41 धावांत त्यांचे शेवटचे सात गडी गमावले आणि त्यामुळे त्यांना 471 धावांत गुंडाळण्यात आले. दुसऱ्या डावात मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह आणि प्रसिद्ध हे सर्व जण शून्यावर बाद झाले आणि भारताने त्यांचे शेवटचे सहा गडी 32 धावांत गमावले.

‘खालच्या फळीतील फलंदाज म्हणून आम्ही निश्चितपणे सुधारणा करण्यासाठी काम करत आहोत. जर तुम्ही आमच्या नेट सत्रांकडे पाहिले तर आम्ही काम करत आहोत हे दिसून येईल. मला वाटते की, स्वत:वर विश्वास ठेवणे, आपल्याकडे असलेल्या कौशल्यावर विश्वास ठेवणे आणि थोडा जास्त काळ क्रीजवर मुक्काम राहील याची खात्री करणे आवश्यक असून. त्यानंतर संख्या आणि धावा दिसतील. आम्ही त्या दिशेने काम करत आहोत, असे प्रसिद्धने पत्रकार परिषदेत सांगितले.

नवीन कर्णधार शुभमन गिलच्या पहिल्या कसोटी सामन्यातील नेतृत्वावर माजी खेळाडूंकडून संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त झाल्या आहेत. ‘शुभमनबद्दल मला वाटते की, त्याने खूप चांगले काम केले. त्याने गोलंदाजांना व्यवस्थित फिरवले, प्रत्येकाला पुरेसे ब्रेक मिळतील याची खात्री केली, योग्य स्पेलमध्ये गोलंदाजांना आणले’, असे आयपीएलमधील ‘पर्पल कॅप’ विजेता प्रसिद्ध म्हणाला. पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना 2 जुलैपासून एजबॅस्टन येथे खेळविला जाईल.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article