जीएसटी कर बदलांमुळे जनतेला दिलासा : मुख्यमंत्री
12:49 PM Sep 04, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
पणजी : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या अध्यक्षतेखाली जीएसटी परिषदेची 56वी बैठक नवी दिली येथे घेण्यात आली. बैठकीत सीतारमण यांनी जीएसटी कर दरांमध्ये बदल करून सामान्य व्यक्ती आणि मध्यमवर्गांना दिलासा दिला आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. नवी दिल्ली येथील जीएसटी परिषदेच्या बैठकीला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी उपस्थित राहून अनेक महत्त्वाच्या मुद्यांवर अर्थमंत्री सीतारमण यांच्याशी चर्चा केली. ही बैठक सुषमा स्वराज भवन येथे पार पडली. देशातील इतर राज्यांचे प्रतिनिधीही उपस्थित होते. या बैठकीत शंकांचे निरसन करण्यासाठी वारंवार विचारले जाणारे प्रश्न देखील उपस्थित करण्यात आले. त्यानंतर जीएसटी परिषदेने काही शिफारशी केल्या असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
Advertisement
Advertisement