महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

दूध उत्पादकांना प्रोत्साहन धन त्वरित द्या

10:38 AM Feb 08, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

भाजपचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : मागण्यांची पूर्तता न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा

Advertisement

बेळगाव : राज्यात सत्तेवर आलेल्या काँग्रेस सरकारकडून गेल्या दहा महिन्यांपासून दुग्ध व्यावसायिक शेतकऱ्यांना प्रोत्साहन धन दिले जात नसल्याने दुग्ध व्यवसायावर परिणाम झाला आहे. सदर प्रोत्साहन धन त्वरित द्यावे, राज्य सरकारकडून किसान सन्मान योजनेंतर्गत देण्यात येणारी रक्कम पुन्हा सुरू करण्यात यावी, मुद्रांक शुल्क कमी करण्यात यावी, अशी मागणी करत बेळगाव शहर व ग्रामीण भाजपतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. शेतीबरोबर दुग्ध व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांनी प्रोत्साहन धन जाहीर केले होते. त्यामुळे दूध व्यवसाय वाढला होता. राज्यात काँग्रेस सरकार सत्तेवर आल्यानंतर दूध उत्पादकांना प्रोत्साहन धन देण्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. राज्यामध्ये 26 लाखांपेक्षा अधिक शेतकरी 85 लाख लीटर दूध उत्पादन करतात. यामुळे ग्राहकांना दूध किफायतशीर दरामध्ये मिळत होते. मात्र राज्यात काँग्रेस सरकार आल्यानंतर दहा महिन्यांपासून शेतकऱ्यांचे 716 कोटी प्रोत्साहन धन देण्यात आलेले नाही. त्यामुळे दूधाचे दर वाढून शेतकऱ्यांना यातून लाभ करून देण्याचे सांगण्यात आले होते. मात्र दहा महिने उलटले तरी शेतकऱ्यांना त्याचा लाभ करून देण्यात आला नाही.

Advertisement

शेतकऱ्यांवर जनावरे विकण्याची वेळ

दुष्काळामुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याऐवजी त्यांच्या जखमेवर मिठ चोळण्याचा प्रकार राज्य सरकारकडून केला जात आहे. राज्य सरकारकडून शेतकऱ्यांची फसवणूक केली जात आहे. शेतकऱ्यांवर जनावरे विकण्याची वेळ येऊन ठेपली आहे. सदर प्रोत्साहन त्वरित देण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली. याबरोबरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी किसान सन्मान योजना जारी करून 6 हजारांची मदत वितरीत करण्यात येत आहे. या योजनेंतर्गत तत्कालीन भाजप सरकारच्या कार्यकाळात शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून 4 हजारांची मदत देण्यात येत होती. सदर मदत बंद करून शेतकऱ्यांवर राज्य सरकारने अन्याय केला आहे. बंद केलेली योजना पुन्हा सुरू करण्यात यावी तसेच मुद्रांक शुल्क वाढ करण्यात आल्याने जमीन खरेदी-विक्रीवर परिणाम झाला आहे.

शेतकऱ्यांना मदतीचा हात त्वरित द्या

राज्य सरकारने मुद्रांक शुल्क मागे घ्यावी. शेतकऱ्यांना त्वरित मदतीचा हात द्यावा, अशी मागणी भाजपकडून करण्यात आली आहे. याची पूर्तता न झाल्यास तीव्र आंदोलन छेडू, असा इशाराही देण्यात आला आहे. यावेळी आमदार विठ्ठल हलगेकर, माजी आमदार अनिल बेनके, मुरगेंद्रगौडा पाटील, भाजप ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुभाष पाटील, महानगराध्यक्षा गीता सुतार, शिल्पा केकरे, सीमा जोशी, रेखा मुचंडी, मंगल पाटील आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article