महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

मासेमारी बंदी संपुष्टात ; आजपासून ताजी मासळी

11:30 AM Aug 01, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

पणजी : राज्यातील मासेमारी बंदी काल गुरुवारी संपुष्टात आली असून नवीन हंगामातील मासेमारीसाठी बोटी रात्री उशिरा समुद्रात गेल्या आहेत. आज दि. 1 ऑगस्टपासून गोमंतकीयांना ताजी फ्ढडफ्ढडीत मासळी राज्यातील विविध बाजारपेठेत उपलब्ध होणार आहे. मासळीचा प्रजनन काळ असून उत्पादन वाढावे म्हणून सरकारतफ्xढ गेले दोन महिने जून-जुलै मासेमारी बंदी लागू करण्यात आली होती. ती आज संपली असून रात्री 12 नंतर अनेक बोटी मासेमारीसाठी समुद्रात उतरल्याची माहिती देण्यात आली. बोटीवर काम करणारे सर्व कामगार अद्याप राज्यात दाखल झालेले नाहीत.  सुमारे 50 टक्के कामगार हजर झाले असून उर्वरित लवकरच येतील आणि आठवडाभरात पूर्ण क्षमतेने मासेमारी हंगाम सुरू होईल, अशी माहिती देण्यात आली आहे.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article