महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

विजेचा धक्का लागून मृत्यू झालेल्या कुटुंबीयाला आर्थिक मदत

12:04 PM Aug 28, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

बेळगाव : शाहूनगर येथे मागील वर्षी विजेचा धक्का लागल्याने एकाच घरातील तिघांचा मृत्यू झाला होता. या कुटुंबाला महिला व बाल कल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी मुख्यमंत्री साहाय्यता निधीतून 6 लाख रुपयांची मदत दिली आहे. मंगळवारी मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांना धनादेश सुपूर्द करण्यात आला. मागील वर्षी वॉटर हिटरमुळे विजेचा धक्का लागून शाहूनगरमधील तिघांचा मृत्यू झाला होता. बांधकाम साईटवर घडलेल्या या अपघातामुळे एकाच कुटुंबातील इराप्पा राठोड, शांतव्वा राठोड व अन्नपूर्णा राठोड यांचा जागीच मृत्यू झाला. या कुटुंबाची हलाखीची परिस्थिती असल्यामुळे मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री मदतनिधीतून 6 लाख रुपये मिळवून दिले. राठोड कुटुंबीयांनी मंत्री हेब्बाळकर यांचे आभार मानले.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article