महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

दिवाळी सणावेळी शहराला पाणीपुरवठा सुरळीत करा

10:53 AM Nov 09, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

महापौरांचे एलअॅण्डटी कंपनीच्या अधिकाऱ्यांना पत्र

Advertisement

बेळगाव : शहरातील काही भागामध्ये पाण्याची समस्या निर्माण होत आहे. त्यामुळे जनतेतून तक्रारी येत आहेत. आता तोंडावरच दिवाळी सण आहे. त्यामुळे संपूर्ण 58 वॉर्डामध्ये पुरेसा पाणीपुरवठा करावा, यासाठी एलअॅण्डटी कंपनीच्या अधिकाऱ्यांना महापौर शोभा सोमणाचे यांनी लेखी स्वरुपात पत्र दिले आहे. दिवाळी साण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या काळात पाणीपुरवठा सुरळीत होणे महत्त्वाचे आहे. तेव्हा सणावेळी सलग चार दिवस पाणीपुरवठा करवा, असे या पत्रामध्ये म्हटले आहे. याचबरोबर काही ठिकाणी दुरुस्तीही महत्त्वाची असून त्याची दुरुस्ती करण्याबाबतही पाऊल उचलावे, असे महापौर शोभा सोमणाचे यांनी सांगितले.

Advertisement

पाणी पुरवठ्याकडे गांभीर्याने लक्ष द्या

शनिवार ते मंगळवारपर्यंत तर पाणीपुरवठा करावाच. याचबरोबर इतर वेळीही पाणीपुरवठा सुरळीत होण्याकडे लक्ष द्यावे, असे त्यांनी सांगितले. गेल्या काही महिन्यांमये पाण्याची समस्या निर्माण होत असल्याच्या तक्रारी महापालिकेकडे केल्या आहेत. तेव्हा याची गांभीर्याने दखल घेवून पाणी पुरवठा सुरळीत करावा, असे त्यांनी स्पष्ट केले.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article