दिवाळी सणावेळी शहराला पाणीपुरवठा सुरळीत करा
महापौरांचे एलअॅण्डटी कंपनीच्या अधिकाऱ्यांना पत्र
बेळगाव : शहरातील काही भागामध्ये पाण्याची समस्या निर्माण होत आहे. त्यामुळे जनतेतून तक्रारी येत आहेत. आता तोंडावरच दिवाळी सण आहे. त्यामुळे संपूर्ण 58 वॉर्डामध्ये पुरेसा पाणीपुरवठा करावा, यासाठी एलअॅण्डटी कंपनीच्या अधिकाऱ्यांना महापौर शोभा सोमणाचे यांनी लेखी स्वरुपात पत्र दिले आहे. दिवाळी साण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या काळात पाणीपुरवठा सुरळीत होणे महत्त्वाचे आहे. तेव्हा सणावेळी सलग चार दिवस पाणीपुरवठा करवा, असे या पत्रामध्ये म्हटले आहे. याचबरोबर काही ठिकाणी दुरुस्तीही महत्त्वाची असून त्याची दुरुस्ती करण्याबाबतही पाऊल उचलावे, असे महापौर शोभा सोमणाचे यांनी सांगितले.
पाणी पुरवठ्याकडे गांभीर्याने लक्ष द्या
शनिवार ते मंगळवारपर्यंत तर पाणीपुरवठा करावाच. याचबरोबर इतर वेळीही पाणीपुरवठा सुरळीत होण्याकडे लक्ष द्यावे, असे त्यांनी सांगितले. गेल्या काही महिन्यांमये पाण्याची समस्या निर्माण होत असल्याच्या तक्रारी महापालिकेकडे केल्या आहेत. तेव्हा याची गांभीर्याने दखल घेवून पाणी पुरवठा सुरळीत करावा, असे त्यांनी स्पष्ट केले.