For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

राज्यसभेच्या 12 जागांसाठी 3 सप्टेंबरला निवडणूक

06:44 AM Aug 08, 2024 IST | Tarun Bharat Portal
राज्यसभेच्या 12 जागांसाठी 3 सप्टेंबरला निवडणूक
Advertisement

महाराष्ट्रातील दोन जागांचा समावेश

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

निवडणूक आयोगाने राज्यसभेच्या 12 रिक्त जागांसाठी बुधवारी निवडणूक जाहीर केली आहे. नऊ राज्यांमधील या 12 जागांसाठी 3 सप्टेंबर रोजी निवडणूक होणार आहे. राज्यसभा निवडणुकीची अधिसूचना 14 ऑगस्ट रोजी जारी केली जाईल आणि उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख 21 ऑगस्ट आहे. 3 सप्टेंबर रोजी राज्यसभेच्या प्रत्येक जागेसाठी स्वतंत्र मतदान होईल. मतदानानंतर त्याच दिवशी निकाल जाहीर होतील. केंद्रीय मंत्री पीयूष गोयल, छत्रपती  उदयनराजे भोसले, सर्वानंद सोनोवाल आणि ज्योतिरादित्य सिंधिया यांच्यासह विद्यमान सदस्य लोकसभेवर निवडून आल्यानंतर राज्यसभेच्या दहा जागा रिक्त झाल्या आहेत.

Advertisement

राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख 26 आणि 27 ऑगस्ट आहे. 14 ऑगस्टपासून उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. 21 ऑगस्ट ही उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे. 22 ऑगस्ट रोजी उमेदवारी अर्जांची छाननी होणार आहे. राज्यसभा पोटनिवडणुकीची प्रक्रिया राज्याच्या विधानसभा संकुलात होणार आहे. गरज भासल्यास 3 सप्टेंबर रोजी सकाळी 9 ते दुपारी 4 या वेळेत मतदान होणार असून त्याच दिवशी संध्याकाळी 5 वाजल्यापासून मतमोजणी होणार असल्याचे निवडणूक अधिकाऱ्याने सांगितले.

एकूण 9 राज्यांमध्ये निवडणूक

आसाम, बिहार आणि महाराष्ट्रातील प्रत्येकी दोन जागांवर आणि हरियाणा, मध्यप्रदेश, राजस्थान, त्रिपुरा, तेलंगणा आणि ओडिशामधील प्रत्येकी एका जागेवर राज्यसभेची पोटनिवडणूक होणार आहे. हरियाणा, आसाम, मध्यप्रदेश, राजस्थान आणि ओडिशा या राज्यांमध्ये भाजपची सत्ता असल्याने संख्याबळ भाजपच्या बाजूने आहे. साहजिकच येथे भाजपचा उमेदवार विजयी होण्याची शक्मयता आहे.

रिक्त झालेल्या जागा

केंद्रीय मंत्री पीयूष गोयल, सर्वानंद सोनोवाल, ज्योतिरादित्य सिंधिया, दीपेंद्र हुडा, छत्रपती उदयनराजे भोसले, मीसा भारती, विप्लब कुमार देव, के. सी. वेणुगोपाल, कामाख्य प्रसाद तासा, विवेक ठाकूर यांच्यासह लोकसभेसाठी विद्यमान सदस्यांच्या निवडीमुळे राज्यसभेच्या दहा जागा रिक्त झाल्या. तर तेलंगणातील केशव राव आणि ओडिशातील ममता मोहंता या दोन सदस्यांच्या राजीनाम्यामुळे दोन जागा रिक्त झाल्या आहेत. राजस्थानमध्ये के. सी. वेणुगोपाल यांनी राज्यसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यामुळे ही जागा रिक्त झाली आहे.

Advertisement
Tags :

.