धर्माचरणाशिवाय केलेली भक्ती निष्फळ
प.पू. परमात्मराज महाराज : हंगरगे येथे श्री विठ्ठल रखुमाई मंदिरात मूर्ती प्रतिष्ठापना-कळसारोहण समारंभ उत्साहात
वार्ताहर/सांबरा
समाजातील प्रत्येक व्यक्तीला ज्ञानाची भूक असते. हंगरगे गावातच ग्रामस्थांना भक्तीभावनेची क्षुधा झालेली आहे. म्हणून तुम्हा सर्वांच्या सहकार्यातून श्री विठ्ठल रखुमाई मंदिराची उभारणी करण्यात आलेली आहे. हे मंदिर उभारताना सर्वांची इष्टभक्ती भावना दृढ होत चालली आहे. प्रत्येकाच्या जीवनात भक्तीभावनेची वीट इष्टऊपात ऊजली पाहिजे. प्रत्येकांनी धर्माचरणाने वागले पाहिजे. धर्मयुक्त इष्टभावनेद्वारे इष्ट कार्य घडत असते. त्या इष्टकावर विठ्ठल विराजमान झालेला आहे. धर्माचरणाशिवाय केलेली भक्ती निष्फळ ठरते, असे मौलिक विचार परमाब्धिकार प.पू. परमात्मराज महाराज यांनी व्यक्त केले. ते हंगरगे येथे श्री विठ्ठल रखुमाई मंदिराच्या मूर्ती प्रतिष्ठापना व कळसारोहण कार्यक्रमप्रसंगी बोलत होते. जय हरी विठ्ठल... जय हरी विठ्ठल, तुकोबा...ज्ञानोबा...जयघोषात हंगरगे येथील जीर्णोद्धार करण्यात आलेल्या श्री विठ्ठल-रखुमाई मंदिराचा कळसारोहण आणि मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा विविध धार्मिक कार्यक्रमांसह पंचक्रोशीतील वारकरी आणि मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये भक्तिमय वातावरणात पार पडला.
आज मंदिराचे लोकार्पण, महाप्रसाद कार्यक्रम
मंगळवार दि. 11 रोजी दुपारी 12 वाजता महिला आणि बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या हस्ते मंदिराचे लोकार्पण करण्यात येणार आहे. त्यानंतर महाप्रसादाचे वितरण होणार आहे. भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन मंदिर कमिटीने केले आहे.