राणी चन्नम्मानगरमधील कचरा समस्या दूर करण्याची मागणी
10:50 AM Nov 17, 2023 IST
|
Tarun Bharat Portal
Advertisement
बेळगाव : राणी चन्नम्मानगर येथील दुसरा क्रॉस परिसरात कचऱ्याची समस्या निर्माण झाली आहे. कचऱ्याची वेळेत उचल होत नसल्याने अडचणी येऊ लागल्या आहेत. रस्त्याशेजारी झाडाची पाने, फांद्या आणि इतर कचरा पडून आहे. मनपा स्वच्छता विभागाचे याकडे दुर्लक्ष झाल्याने स्थानिक नागरिकांना समस्यांना सामोरे जावे लागत आहे. मागील काही दिवसांपासून या ठिकाणची स्वच्छता करण्यात आली नाही. त्यामुळे कचरा साचून आहे. त्यामुळे कुत्र्यांचा उपद्रव वाढू लागला आहे. परिणामी याचा स्थानिक नागरिकांना धोका निर्माण होऊ लागला आहे. तातडीने कचऱ्याची उचल करून परिसराची स्वच्छता करावी, अशी मागणी होत आहे.
Advertisement
Advertisement
Advertisement
Next Article