महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

भारतीयांची सुटका करण्याची मागणी

06:32 AM Feb 24, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था / नवी दिल्ली 

Advertisement

रशियाच्या सैन्याला साहाय्य करण्याच्या कामी ज्या भारतीयांना नेमण्यात आले आहे, त्यांची लवकर या कामातून सुटका करावी, अशी मागणी भारताने रशियाकडे केली आहे. भारताचे काही नागरीक रशियात असून ते रशियाच्या सैन्याला साहाय्य आणि साधनसामग्रीचा पुरवठा करण्याचे काम करतात.

Advertisement

मात्र, या भारतीय नागरीकांची भरती रशियाच्या वेगेनार दलात त्यांच्या संमतीशिवाय केली जाते, असा आरोप गेल्या काही दिवसांपासून होत आहे. वेगेनार हे रशियातील खासगी सैन्यदल असून त्यांचे नियंत्रण रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याकडे आहे, असा आरोप केला जातो. रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धात या खासगी सैन्याचाही उपयोग केला गेला होता असाही आक्षेप घेतला जातो. या पार्श्वभूमीवर रशियाच्या अधिकृत सैन्यदलांना साहाय्य पुरविण्याचे काम करणाऱ्या भारतीय नागरीकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे भारताने रशियाकडे या कर्मचाऱ्यांना लवकर सेवामुक्त करण्याची मागणी केली आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article