महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

सदाशिवनगर स्मशानभूमीच्या शेडवरील पत्रे त्वरित बसवण्याची मागणी

10:33 AM Jun 01, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

बेळगाव : सदाशिवनगर स्मशानभूमी येथील अंत्यसंस्कार करण्याच्या शेडवरील पत्रे उडून गेले आहेत. याबाबत सातत्याने पाठपुरावा करूनही अद्याप पत्रे बसविण्यात आले नाहीत. पावसाळ्यापूर्वी या शेडवर पत्रे घालावेत. जेणेकरून अंत्यसंस्कार करण्यात अडचण येणार नाही, अशा मागणीचे निवेदन स्वराज्य युवा दलाच्यावतीने साईराम जहांगीरदार यांनी महानगरपालिका आयुक्तांना दिले आहे. निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, स्मशानभूमीची दुरवस्था झाली आहे. शेडवर पत्रे नाहीत. बऱ्याचदा येथील दिवे बंद असतात. आसपास बरीच अस्वच्छताही आहे. याची दखल घेऊन लवकरात लवकर या गैरसोयी दूर कराव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी सौरभ सावंत, अवधूत तुडवेकर, विवेक महांतशेट्टी व दर्शन हावळ उपस्थित होते.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article