उत्तर गोव्यात कॉम्बिंग ऑपरेशन, नाकाबंदी..!
पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांनी घेतली अनेकांची झडती
प्रतिनिधी/ पणजी
सुरक्षितता आणि सुरक्षेच्या मुद्द्यावर उत्तर गोवा जिह्यातील सर्व पोलिसांनी अॅक्टिव्ह होत शुक्रवारी मध्यरात्रीपासून कॉम्बिंग ऑपरेशन करीत अनेक ठिकाणी नाकाबंदी करून अनेकांची कसून तपासणी केली. उत्तर गोवा जिह्यातील प्रत्येक पोलिस ठाण्यांनी परप्रांतीय, संशयित नागरिक, संशयित वाहने यांची तपासणी करून अनेकांना अटकही केली.
शुक्रवारी मध्यरात्री उत्तर गोवा जिह्यातील प्रत्येक पोलिस स्टेशनद्वारे कोम्बिंग ऑपरेशन्स आणि नाकाबंदीचे आयोजन करण्यात आले होते. या कारवाईत कामरभाट मिरामार, इंदिरानगर चिंबल, मेरशी, सांताक्रुझ, एकता नगर, खोर्ली-म्हापसा, अरपोरा नागोवा, औचितवाडा - कोलवाळ, वाठादेव डिचोली, नेवरा आदी ठिकाणी कोम्बिंग ऑपरेशन पोलिसांनी रात्रभर सुरू ठेवले होते. त्याचबरोबर बांबोळी येथील (11 जण), हरमल (12 व्यक्ती), दोनवाडा - साल्वादोर द मुंद (13), बागा, सिकेरी (14) मालपे रेल्वे स्टेशन आदी ठिकाणी लपून बसलेल्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
उत्तर गोवा जिह्यातील 29 मोक्याच्या ठिकाणी नाकाबंदी आयोजित करण्यात आली होती. नाकाबंदी दरम्यान, संशयास्पद वाहनांची तपासणी करण्यात आली आणि संशयित व्यक्तींची चौकशी करण्यात आली. संशयित व्यक्तींना अटक करण्यात आली. प्रतिबंधात्मक कारवाई अंतर्गत काहींना अटक करण्यात आली आणि अनोळखी व्यक्तींची नोंदणी भरण्यात आली. हॉटेल्स, गेस्ट हाऊस, होम स्टे इत्यादी ठिकाणी राहणाऱ्या परदेशी नागरिकांच्या संदर्भात भाडेकरू, नोकरांची पडताळणी आणि ‘सी’ फॉर्म भरण्यात आले.
रेल्वे किंवा आंतरराज्यीय बसमधून उतरणाऱ्या संशयित प्रवाशांची तपासणी करण्यासाठी करमळी, थिवी, पेडणे (मालपे) रेल्वे स्थानकांवर तसेच पणजी आणि म्हापसा बसस्थानकांवर अधिकाऱ्यांनी पोलिस कर्मचारी तैनात केले होते.
अटक केलेल्या व्यक्तींची नोंदणी
पोलिसांनी कॉम्बिंग ऑपरेशन राबविताना ज्या व्यक्ती संशयास्पद वाटत होत्या, त्यांची कसून तपासणी केली. याशिवाय जे भाड्याने राहतात त्या भाडेकरूंची व घरमालकांची चौकशी करण्यात आली. नोकर किंवा घरकाम करणाऱ्यांची संख्या
सत्यापित प्रतिबंधात्मक कारवाई अंतर्गत अटक केलेल्या व्यक्तींची संख्या आणि त्या अनोळखी व्यक्तींची पोलिसांनी नोंदणी करून घेतली. काहीजणांना तर अटक करून हे गोव्यात नेमक्या कोणत्या कारणासाठी राहतात आणि कोणते काम करतात, याविषयी रात्रभर चौकशी सत्र राबविण्यात आले.