कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

कोनवाळ गल्लीतील ई-आस्थी केंद्र बंद झाल्याने नागरिकांची गैरसोय

10:34 AM Oct 18, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

बेळगाव : महापालिकेच्या कोनवाळ गल्ली येथील विभागीय कार्यालयामध्ये ई-आस्थी नोंदणीसाठी स्वतंत्र कक्ष सुरू करण्यात आला होता. मात्र गेल्या चार दिवसांपासून त्या ठिकाणचा कक्ष बंद ठेवण्यात आला असल्याने ए व बी खाते मिळविण्यासाठी येणाऱ्या मिळकत धारकांना माघारी परतावे लागत आहे. याकडे मनपा आयुक्तांनी लक्ष घालून नागरिकांची होणारी गैरसोय दूर करावी, अशी मागणी केली जात आहे.

Advertisement

यंत्रणेत बिघाड झाल्याचे कारण

Advertisement

शहर व उपनगरातील मालमत्तांना गेल्या आठ महिन्यापासून ई-आस्थी प्रणाली अंतर्गत नोंद करून घेऊन त्यांना ए व बी खाता दिला जात आहे. सुरुवातीला महापालिकेच्या मुख्य कार्यालयात अर्ज स्वीकारण्याची व्यवस्था करण्यात आली होती. मात्र नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी महापालिकेच्या विभागीय कार्यालयांसह बेळगाव वन केंद्रांमध्ये देखील अर्ज व आवश्यक कागदपत्रे स्वीकारली जात आहेत. त्या ठिकाणी एक ऑपरेटर, कॉम्प्युटर, स्कॅनर व इतर आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. कोनवाळ गल्लीतील कार्यालयातदेखील स्वतंत्र कक्ष सुरू करण्यात आला होता. पण यंत्रणेत बिघाड झाल्याचे कारण सांगून ई-आस्थीसाठी अर्ज स्वीकारणे बंद करण्यात आले आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article