महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

नैतिक जबाबदारी स्वीकारून मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा

11:02 AM Sep 27, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

निजदचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

Advertisement

बेळगाव : मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याविरुद्धच्या आरोपांच्या चौकशीसाठी न्यायालयाने लोकायुक्तांना एफआयआर दाखल करण्यास परवानगी दिली आहे. मुख्यमंत्र्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा व नि:पक्ष चौकशीस मुभा द्यावी, अशी मागणी निजदने केली आहे. मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, या मागणीसाठी गुरुवारी निजद कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. जिल्हाध्यक्ष शंकर माडलगी यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढून जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत राज्यपालांना निवेदन पाठविण्यात आले आहे.

Advertisement

कोणत्याही परिस्थितीत मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांच्याविरुद्ध राज्यपालांनी खटला दाखल करण्यास अनुमती दिल्यानंतर याच सिद्धरामय्या यांनी येडियुराप्पा यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. आता हीच वेळ त्यांच्यावर आली आहे. लोकायुक्तांना एफआयआर दाखल करण्यास न्यायालयाने परवानगी दिल्यानंतर त्यांनी राजीनामा द्यायला नको का? असा प्रश्न उपस्थित करण्यात आला असून मुख्यमंत्र्यांनी त्वरित आपल्या पदाचा राजीनामा देऊन नि:पक्षपाती चौकशीसाठी सहकार्य करावे, अशी मागणीही निजदने केली आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article