पाण्यासाठी खानापूर रोडवर चक्काजाम कॅन्टोन्मेंट वासियांचा पवित्रा
12:48 PM Nov 03, 2022 IST | Rohit Salunke
बेळगाव - कॅन्टोन्मेंट वासियांना गेले १५ दिवसापासून पाणी मिळाले नाही. पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी निवेदन देण्यात आली. विनंती अर्जव करण्यात आले. तरी देखील १५ दिवस झाले पाणी मिळाले नसल्याने, गुरुवारी कॅन्टोन्मेंट वर मोर्चा काढण्यात आला, पण त्या ठिकाणी देखील आश्वासन खेरीज काहीच मिळाले नाही. तर कॅन्टोन्मेंटच्या सीईओंनी जिल्हाधिकाऱ्यांकडे बोट केल्याने महिलांनी खानापूर रोडवर रस्ता रोको करत आंदोलन केले. त्यामुळे खानापूर रोडवर चक्काजाम झाला आहे.
Advertisement
Advertisement