महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

भाजप सलग तिसऱ्यांदा सत्तेत येणार !

06:29 AM Jun 01, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पक्ष सलग तिसऱ्यांना सरकार स्थापन करणार आहे, असा विश्वास राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी व्यक्त केला आहे. राजस्थानातील दौसा येथील मेहंदीपूर बालाजी मंदिरात त्यांनी शुक्रवारी प्रार्थना केली. त्याप्रसंगी ते पत्रकारांशी वार्तालाप करीत होते.  त्यांच्यासह केंद्रीय मंत्री पियुष गोयल आणि लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनीही या मंदिरात प्रार्थना आणि पूजाआर्चा केली. या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला मोठा विजय मिळून पूर्ण बहुमताचे सरकार आपला केंद्रात स्थापन करणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर या देशातील सर्वसामान्य मतदाराचा दृढ विश्वास आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्ष सलग तिसऱ्यांदा मोठे बहुमत प्राप्त करणार आहे, असे प्रतिपादन शर्मा यांनी केले. बालाजी मंदिरात आम्ही राजस्थान आणि भारत देश यांच्या समृद्धीसाठी आणि उत्कर्षासाठी प्रार्थना केली. राज्यात आणि देशात शांतता असावी अशी मनोकामनाही परमेश्वराजवळ व्यक्त केली, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
##tarunbharat#Political#social media
Next Article