For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कणबर्गीत भातगंजी जळून खाक

11:17 AM Jan 08, 2024 IST | Tarun Bharat Portal
कणबर्गीत भातगंजी जळून खाक
Advertisement

कलखांब येथे टोमॅटो पिकाची नासधूस : नुकसानभरपाईची मागणी

Advertisement

वार्ताहर/सांबरा

कणबर्गी येथे अज्ञातानी लावलेल्या आगीत भातगंजी जळून खाक झाली आहे. त्यामुळे सुमारे 30 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. सदर घटना रविवारी सकाळी उघडकीस आली. कणबर्गी येथील मंदा जाणाई यांच्या शेतातील भाताच्या गंजीला शनिवारी रात्री अज्ञातानी आग लावल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. रविवारी सकाळी ही घटना उघडकीस आल्यानंतर शेतकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, तोपर्यंत भाताची गंजी जळून खाक झाली होती. त्यामुळे मंदा जाणाई यांचे सुमारे 30 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. यंदा पावसाअभावी भात पिके म्हणावी तशी पिकली नाहीत. अशातच मंदा जाणाई यांनी कष्ट करून भात पीक पिकविले होते. मात्र भाताची रास घरी येण्यापूर्वीच अज्ञातानी गंजी पेटवून दिल्याने त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी घटनेचा पंचनामा करून तातडीने नुकसानभरपाई मिळवून द्यावी अशी मागणी जाणाई कुटुंबीयांनी केली आहे.

Advertisement

कलखांब येथे टोमॅटोची नासधूस

कलखांब येथील शेतकरी रमेश हिरोजी यांच्या शेतामध्ये टोमॅटोचे पीक बहरले होते. काही दिवसात टोमॅटो लागवडीलाही प्रारंभ होणार होता. मात्र अज्ञातानी टोमॅटोच्या उभ्या पिकाची नासधूस केली आहे. सुमारे 15 गुंठ्यामध्ये असलेले टोमॅटो पिकाचे नुकसान झाल्याने रमेश हिरोजी याना आर्थिक फटका बसला आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी पाहणी करून नुकसानभरपाई मिळवून द्यावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.

Advertisement
Tags :

.