कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

‘सुंदर’ तो ‘वॉशिंग्टन’ !

06:00 AM Aug 01, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

भारताच्या इंग्लंड दौऱ्याचं एक वैशिष्ट्या राहिलंय ते खालच्या फळीच्या जबरदस्त प्रतिकाराचं. याकामी रवींद्र जडेजाबरोबर चौथी कसोटी वाचविताना प्रभावी योगदान दिलं ते वॉशिंग्टन सुंदरनं...फलंदाजीबरोबर फिरकी माऱ्यात उपयुक्त ठरणाऱ्या या खेळाडूनं संघ व्यवस्थापनाचा त्याला पसंती देण्याचा निर्णय सार्थ ठरविलाय...

Advertisement

चौथ्या कसोटीत भारत बचावला तो ‘त्यानं’ झळकावलेल्या नाबाद 101 व सध्या अप्रतिमरीत्या झुंजणाऱ्या रवींद्र जडेजाच्या नाबाद 107 धावांच्या खेळीमुळं...त्यांनी पाचव्या यष्टीसाठी केली ती 203 धावांची ‘गेमचेंजर’ भागीदारी...‘त्याची’ गेल्या ऑक्टोबर महिन्यात न्यूझीलंडविरुद्ध आपल्या भूमीवर झालेल्या कसोटी मालिकेसाठी निवड झाली तीच अनपेक्षितरीत्या. ‘त्यानं’ त्यापूर्वी तामिळनाडूचं प्रतिनिधीत्व करताना रणजी चषक स्पर्धेत दिल्लीला दिला होता तो 152 धावांचा ‘प्रसाद’...विशेष म्हणजे तो राज्यासाठी फलंदाजी करतोय ती तिसऱ्या क्रमांकावर...नाव : वॉशिंग्टन सुंदर...

Advertisement

रणजी स्पर्धेतील त्या डावानंतर वॉशिंग्टननं म्हटलं होतं, ‘खरं सांगायचं झाल्यास मी स्वत:ला वरच्या क्रमांकावर खेळणारा फलंदाजच समजतोय. भविष्यात सुद्धा नेहमी चांगल्या कामगिरीचं दर्शन सातत्यानं घडविण्याचा प्रयत्न करेन’...न्यूझीलंडनं त्या मालिकेत फिरकीला साथ देणाऱ्या खेळपट्ट्यांवर भारताला झोडपल्यानंतर गडबडलेल्या निवड समितीनं ऑफस्पिनर म्हणून वॉशिंग्टन सुंदरला संधी दिली होती. त्यानंतर एका महिन्यानं पर्थ कसोटीत जेव्हा भारतीय संघ क्षेत्ररक्षणासाठी मैदानात उतरला तेव्हा त्याला मिळालं होतं ते आर. अश्विन नि रवींद्र जडेजापेक्षाही वरचं स्थान. सध्या चालू असलेल्या इंग्लंडच्या दौऱ्याचा विचार केल्यास वॉशिंग्टनला दुसऱ्या कसोटीसाठीच्या अंतिम 11 खेळाडूंत स्थान प्राप्त झालं ते त्याच्या गोलंदाजीपेक्षाही फलंदाजीच्या चांगल्या क्षमतेमुळं...

कुलदीप यादवला स्थान मिळावं म्हणून विश्लेषकांचा आरडाओरडा चालूच होता, तरीही सुंदरला दुसरा ‘स्पिनर’ बनविण्यात आलं. चौथ्या कसोटीत त्यानं टीकाकारांना छान उत्तर दिलंय ते पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करताना. तो व रवींद्र जडेजा यांच्या भागीदारीमुळंच भारताला मालिकेत टिकून राहणं शक्य झालंय...वॉशिंग्टन सुंदर ठरलाय मँचेस्टरवर कारकिर्दीतील पहिलं शतक फटकावणारा दुसरा भारतीय खेळाडू. विशेष म्हणजे 1990 साली महान सचिन तेंडुलकरनं सुद्धा त्याच्या कसोटी कारकिर्दीतील पहिलंवहिलं शतक झळकावलं होतं ते तिथंच....वॉशिंग्टननं इंग्लंडच्या जलदगती गोलंदाजांना चेंडू उसळत असताना संयमानं, तंत्राचा उपयोग करत ज्या पद्धतीनं तोंड दिलंय ते अत्यंत कौतुकास्पद. याचा अर्थ त्यानं कसोटी कारकिर्दीत पहिल्यांदाच व्यवस्थित फलंदाजी केलीय असा मात्र अजिबात नव्हे...

वॉशिंग्टन सुंदरनं ऑस्ट्रेलियातील गब्बावर 2021 साली कारकिर्दीतील पहिल्याच कसोटी सामन्यात नोंद केली होती ती अर्धशतकाची. खेरीज इंग्लंडलाही भारताच्या भूमीवर खेळताना त्यानं नाबाद 96 धावांची खेळी करत आपल्या क्षमतेची चुणूक दाखविली होती. त्याची कसोटीतील सरासरी 40 हून जास्त असली, तरी मँचेस्टवर चौथ्या सामन्यात त्याच्यापुढं आव्हान उभं होतं ते वेगळ्या प्रकारचं. सुंदरला संघ व्यवस्थापनानं फलंदाजी करण्याची संधी दिली ती पाय मोडलेल्या रिषभ पंतच्या क्रमांकावर. या पार्श्वभूमीवर त्याला त्याची कुवत सिद्ध करणं अत्यंत गरजेचं बनलं होतं आणि त्यानं ते चोखपणे केलं देखील...

खेरीज वॉशिंग्टन सुंदरनं इंग्लिश फलंदाजांचे बळी खिशात घातल्यानं कुलदीप यादववरचा दबाव वाढण्यास प्रारंभ झालाय. प्रशिक्षक गौतम गंभीरच्या शब्दांत सांगायचं झाल्यास, ‘तो सध्या खराच छान खेळतोय. काही वेळा पाळी येते ती संघात सात वा आठ फलंदाजांचा समावेश करण्याची अन् सर्वांनाच संधी देणं शक्य होत नाहीये. रिषभच्या अनुपस्थितीत आम्ही निर्णय घेतला तो ‘विशी’ला पाचव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी पाठविण्याचा. जाळ्यात सराव करताना खुद्द वॉशिंग्टनलाही त्याच्या ‘फॉर्म’ची चांगलीच कल्पना होती’...त्यानं लॉर्ड्स कसोटीत चार प्रतिस्पर्धी फलंदाजांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखविला आणि भारतासाठी दार उघडलं...

संघ व्यवस्थापनानं वॉशिंग्टन सुंदरचं वर्णन ‘दुसरा फिरकी गोलंदाज’ आणि ‘आठव्या क्रमांकावर धावा काढण्याची क्षमता असलेला फलंदाज’ असं केलंय...पत्रकारांनी त्यासंबंधी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना तो म्हणतो, ‘संघासाठी योगदान देणं हे माझं काम आणि ते मी प्रामाणिक पद्धतीनं करतोय. मला प्रत्येक वेळी वेगवेगळी भूमिका देण्यात आलीय आणि ती मी पार पाडलीय. कसोटी क्रिकेट उत्साहवर्धक ठरतंय ते त्यामुळंच’...वॉशिंग्टनला भारतीय संघाचा नवा ‘सुंदर’ चेहरा असं म्हटल्यास ते चुकीचं ठरणार नाहीये. तो कारकिर्दीला प्रारंभ झाल्यानंतर कित्येक संस्मरणीय कसोटी सामने खेळलाय. एक मात्र खरं की, भविष्यात त्याला संघातून वगळताना निवड समितीला किंवा संघ व्यवस्थापनाला किमान दहा वेळा विचार करावा लागेल !

वेगळ्या नावामागची रंजक कहाणी...

आरंभीचा प्रवास...

‘आयपीएल’ ते भारतीय संघ...

कसोटीत पाऊल...

दणक्यात पुनरागमन...

- राजू प्रभू

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article