नरसेवाडी येथे घराची भिंत पडून गोठा उद्ध्वस्त
10:46 AM Aug 07, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
खानापूर : खानापूर तालुक्यातील नरसेवाडी येथे शेजारील घराची भिंत गोठ्यावर पडून गोठ्यात बांधलेली एक म्हैस, दोन बैल आणि काही बकरी जखमी झाल्याची घटना घडली आहे. याबाबत ग्राम पंचायत अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली आहे. नरसेवाडी येथील जयंत मारुती पाटील यांचा शेती व्यवसाय आहे. त्यांनी आपल्या मागील बाजूस गोठा बांधून जनावरांची सोय केली आहे. त्यांच्या शेजारी असलेले संतोष पाटील यांच्या घराची भिंत सतत होत असलेल्या पावसामुळे रविवारी दुपारी पडून गोठ्यात बांधलेली एक म्हैस, दोन बैल आणि काही बकरी किरकोळ जखमी झाली आहेत. त्यामुळे शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. नरसेवाडी येथे अनेक बंद घरे असून त्यांची देखभाल नसल्याने शेजाऱ्यांच्या घरांना धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे बंद घराशेजारील रहिवाशांच्या चिंतेत भर पडली आहे.
Advertisement
Advertisement