महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

जुन्या बसस्थानकातून बस सुरू करण्यासाठी खानापुरात सर्वपक्षीयांचा उद्या रास्तारोको

10:50 AM Sep 23, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

खानापूर : खानापूर शिवस्मारक येथील जुन्या बसस्थानकात बस येण्याचे बंद झाले आहेत. त्यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. जुन्या बसस्थानकात बस पूर्वीप्रमाणे सोडाव्यात, अशी मागणी आगार प्रमुखांना वारंवार करूनदेखील याची दखल घेण्यात आलेली नाही. त्यामुळे शहरातील सर्वपक्षीयांच्यावतीने आणि नागरिकांच्यावतीने मंगळवार दि. 23 रोजी सकाळी 11 वाजता राजा छत्रपती शिवाजी चौकात रास्तारोको करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राजा छत्रपती चौकात पूर्वीपासून असलेल्या जुन्या बसस्थानकात गेल्या दोन महिन्यापासून बेळगावसह इतर ठिकाणी जाणाऱ्या बसेस येण्याचे बंद झाले आहेत. तसेच बेळगावहून खानापूरला परत येताना देखील जुन्या बसस्थानकात बस आणण्याचे बंद झाले असल्याने शहरासह ग्रामीण भागातील प्रवाशांना गेल्या दोन महिन्यांपासून नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

Advertisement

याबाबत आगारप्रमुखांना  बस जुन्या बसस्थानकापासून सोडण्यात याव्यात, तसेच बेळगावहून येणाऱ्या बसेस जुन्या बसस्थानकात आणण्यात याव्यात, अशी मागणी करूनदेखील याची दखल घेण्यात आली नाही. शनिवारी सर्वपक्षीय शिष्टमंडळाने बस आगारप्रमुखांची भेट घेऊन रविवारी जुन्या बसस्थानकात बस सोडण्यात याव्यात, अन्यथा मंगळवारपासून रास्तारोको करण्याचा इशारा देण्यात आला होता. मात्र याची दखल आगार प्रमुखांनी घेतली नसल्याने ठरल्याप्रमाणे मंगळवारी सकाळी 11 वाजता राजा छत्रपती चौक येथे रास्तारोको करण्यात येणार आहे. या शिष्टमंडळात भाजपचे ज्येष्ठ नेते संजय कुबल, काँग्रेसचे ब्लॉक अध्यक्ष ईश्वर घाडी, पंडित ओगले, ज्येष्ठ पत्रकार प्रकाश देशपांडे, नितीन पाटील, अजित पाटील यांनी आगार प्रमुखांची भेट घेऊन इशारा दिला होता. त्याप्रमाणे मंगळवारी रास्तारोको करणार असल्याचे सांगण्यात आले.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article