अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा
बेळगाव प्रतिनिधि - विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जात नाही. महाविद्यालयीन व्यवस्थापक मंडळ संबंधित खात्याला विचारा असे सांगते. तर संबंधित खात्याकडे गेले असता थातुर मातूर उत्तर दिली जात आहेत त्यामुळे विद्यार्थ्यांना केवळ हेलपाटे घालावे लागत आहेत तेव्हा तातडीने संबंधित अधिकाऱ्यांना विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती देण्यास भाग पाडावे याचबरोबर इतर मागण्यांसाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन देण्यात आले . नवीन शैक्षणिक धोरणामुळे विद्यार्थ्यांचा निकाल वेळेत दिला जात नाही त्यामुळे विद्यार्थ्यांना नागरिक त्रास सहन करावा लागत आहे तेव्हा त्यामध्येही सुधारणा करावी आणि विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन करून निकाल द्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली यावेळी किरण दुकानदार सह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.