महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

‘एआय’ नागरिकांच्या सेवेत मोठे बदल आणणार

06:24 AM Jul 03, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

जागतिक पातळीवर सहमतीची गरज : सेल्फफोर्स इंडियाच्या सीईओ अरुंधती भट्टाचार्य यांचे बदलत्या एआयवर भाष्य

Advertisement

नवी दिल्ली :

Advertisement

एआयचे सीमापार स्वरूप पाहता, जागतिक कराराची गरज आहे. एआयच्या मदतीने त्याचे फायदे संपूर्ण मानवजातीपर्यंत पोहोचवण्यास मदत होईल. तसेच कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) भारतासाठी सार्वजनिक सेवांच्या वितरणात क्रांती घडवून आणेल, असा विश्वास सेल्सफोर्स इंडियाच्या सीईओ अरुंधती भट्टाचार्य यांनी यावेळी व्यक्त केला आहे.

एआय आरोग्यसेवेपासून शिक्षण आणि कौशल्य विकासापर्यंत प्रत्येक क्षेत्रात क्रांती घडवून आणण्यासाठी तयार आहे. या भविष्यकालीन तंत्रज्ञानाच्या आगमनामुळे भारताला मोठा फायदा होईल, असेही भट्टाचार्य यांनी म्हटले आहे. तंत्रज्ञानाचे सीमापार स्वरूप आणि त्याचा प्रभाव पाहता, एआयवर जागतिक कराराची गरज आहे. परंतु चुकीच्या हातात ते हानिकारक ठरू शकते आणि म्हणून सावधगिरी बाळगणे आवश्यक असल्याचा सल्लाही यावेळी त्यांनी दिला आहे.

 

 

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article