For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

रिलायन्स जिओ-एसईएस यांच्यात करार

06:12 AM Jun 15, 2024 IST | Tarun Bharat Portal
रिलायन्स जिओ एसईएस यांच्यात करार
Advertisement

वृत्तसंस्था/  मुंबई

Advertisement

रिलायन्स जिओने एसईएस या लक्झेंबर्ग कंपनीच्या सहकार्याने भारतात गिगाबिट स्पीड फायबर इंटरनेट पुरवण्याची योजना आखली आहे. यासाठी त्यांना भारताच्या अंतराळ नियामकाकडून अवकाश उपग्रह चालवण्याची परवानगी मिळाली आहे. सूत्रांकडून ही माहिती समोर आली आहे.

ऑर्बिट कनेक्ट इंडियाला तीन परवानग्या देण्यात आल्या आहेत. अंतराळातून हायस्पीड इंटरनेट पुरवण्याचेही या कंपनीचे उद्दिष्ट आहे. भारत हा जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या देशांपैकी एक आहे आणि इथल्या अनेक विदेशी कंपन्या-अॅमेझॉनपासून ते एलॉन मस्कच्या स्टारलिंकपर्यंत-अंतराळ इंटरनेट सेवा सुरू करण्याचा प्रयत्न करत आहेत. या परवानग्या यापूर्वी कळवण्यात आल्या नाहीत. त्यांना इंडियन नॅशनल स्पेस प्रमोशन अँड ऑथोरायझेशन सेंटरने एप्रिल आणि जूनमध्ये मान्यता दिली होती. यामुळे ऑर्बिट कनेक्टला भारतावर उपग्रह चालविण्याची परवानगी मिळते, परंतु आता सेवा सुरू करण्यासाठी भारताच्या दूरसंचार विभागाकडूनही परवानगी घ्यावी लागणार आहे.

Advertisement

इन स्पेसचे अध्यक्ष पवन गोयंका यांनी रॉयटर्सला सांगितले, एलॉन मस्कच्या स्टारलिंक आणि अॅमेझॉनच्या कुइपर या दोन अन्य कंपन्यांनीही अर्ज केला आहे.

भारती एंटरप्रायझेस-समर्थित एटेलास्टच्या वनवेबला गेल्या वर्षीच्या अखेरीस सर्व परवानग्या मिळाल्या. डीलोआयटी, एक सल्लागार कंपनीच्या मते, भारताच्या उपग्रह ब्रॉडबँड सेवा बाजाराची पुढील पाच वर्षांत वार्षिक 36 टक्के वाढ आणि 2030 पर्यंत 1.9 अब्ज डॉलरपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे.

जगभरात, अंतराळाच्या माध्यमातून दुर्गम भागात इंटरनेट पोहोचवण्याची शर्यत जोरात सुरू आहे. अॅमेझॉनने 2019 मध्ये घोषित केलेल्या कुइपर प्रकल्पात 10 अब्ज डॉलर गुंतवण्याची योजना आखली आहे, त्याच वर्षी स्पेसएक्सने त्याचा पहिला कार्यरत स्टारलिंक उपग्रह तैनात करण्यास सुरुवात केली.

गेल्या आठवड्यातच, श्रीलंकेने स्टारलिंकला तेथे इंटरनेट सेवा देण्यासाठी प्राथमिक मान्यता दिली. वाहन निर्माता महिंद्रा अँड महिंद्राचे माजी एमडी गोयंका म्हणतात की, भारतातील या क्षेत्रात जितक्या जास्त कंपन्या सामील होतील तितक्या ग्राहकांसाठी ते अधिक चांगले होईल.

गोयंका पुढे म्हणाले, भारतातील दळणवळण सेवांच्या तुलनेने कमी किमतीमुळे परदेशी कंपन्यांना नावीन्यपूर्णतेला प्रोत्साहन देण्यासाठी भाग पाडले जाईल जेणेकरून त्यांच्या किंमती कमी करता येतील. ऑटोमोबाईल उद्योगासारख्या अनेक उद्योगांमध्ये हे आधीच केले जात आहे, जेथे बहुराष्ट्रीय ओइएमएसना उच्च कार्यक्षमता आणि भारतीय ग्राहकांच्या कमी किमतीच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी नवनिर्मिती करावी लागली आहे.

Advertisement
Tags :

.