For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अफगाण-पाकिस्तान शांतता चर्चा अयशस्वी

06:11 AM Nov 10, 2025 IST | Tarun Bharat Portal
अफगाण पाकिस्तान शांतता चर्चा अयशस्वी
Advertisement

वृत्तसंस्था/ इस्लामाबाद

Advertisement

तुर्कीमधील इस्तंबूल येथे पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील शांतता चर्चा कोणत्याही कराराविना संपल्यानंतर तणाव वाढला आहे. तुर्की आणि कतारच्या मध्यस्थीने चर्चेचा हा तिसरा टप्पा आयोजित करण्यात आला होता. पाकिस्तानने पुन्हा एकदा अफगाणिस्तानला गंभीर परिणामांची धमकी दिली आहे. दुसरीकडे, तालिबाननेही युद्धाची तयारी दर्शविली आहे. दोन्ही बाजू चर्चेच्या अपयशासाठी एकमेकांना दोष देत असल्याने युद्धभूमीवरील तणाव भडकण्याची चिन्हे व्यक्त होत आहेत.

अलिकडच्या आठवड्यात पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमेवर झालेल्या भीषण संघर्षानंतर तणाव शिगेला पोहोचला आहे. दोन्ही देशातील संघर्षात डझनभर सैनिक आणि नागरिक मारले गेले आहेत. हा संघर्ष असाच सुरू राहिला तर त्याचा प्रादेशिक स्थिरतेवर खोलवर परिणाम होऊ शकतो. इस्तंबूल येथे झालेल्या तिसऱ्या फेरीच्या चर्चेनंतरही कोणतीही ठोस प्रगती झाली नाही. अफगाण तालिबान सरकारचे प्रवक्ते जबिउल्लाह मुजाहिद यांनी चर्चेच्या अपयशासाठी पाकिस्तानला जबाबदार धरले, तर पाकिस्तान अफगाणिस्तानला जबाबदार धरत आहे. तालिबानने पाकिस्तानच्या मागण्या अवास्तव असल्याचे म्हटले आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.