For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘एस-400’ची चौथी स्क्वॉड्रन वर्षअखेरीस

06:11 AM Feb 06, 2025 IST | Tarun Bharat Portal
‘एस 400’ची चौथी स्क्वॉड्रन वर्षअखेरीस
Advertisement

प्रगत हवाई संरक्षण प्रणाली : सिलिगुडीमध्ये तैनात करण्याचे नियोजन : सुरक्षा यंत्रणांना नवे बळ

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

चालू वर्षाच्या अखेरीस भारताला रशियन बनावटीच्या एस-400 हवाई संरक्षण प्रणालीची चौथी स्क्वॉड्रन मिळू शकते. तर पाचवे स्क्वॉड्रन 2025 च्या अखेरीस येण्याची अपेक्षा आहे. आतापर्यंत भारताने एस-400 प्रणालीचे तीन स्क्वॉड्रन मिळवले आहेत. त्यांना विविध ठिकाणी तैनात करण्यात आले आहे. भारताने 2028 पर्यंत एस-400 प्रणालीच्या पाच स्क्वॉड्रनसाठी रशियासोबत सुमारे 35,000 कोटी रुपयांचा करार केला होता. ही प्रगत हवाई संरक्षण प्रणाली भारताच्या मोक्याच्या ठिकाणांचे रक्षण करण्यात महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.

Advertisement

सिलिगुडी कॉरिडॉर सुरक्षित करण्यासाठी एक स्क्वॉड्रन तैनात करण्यात आले आहे. पठाणकोट परिसरात आणखी एक स्क्वॉड्रन तैनात करण्यात आले आहे. या  माध्यमातून जम्मू-काश्मीर आणि पंजाबची संरक्षण व्यवस्था मजबूत झाली आहे. राजस्थान आणि गुजरातमधील महत्त्वाच्या ठिकाणांच्या सुरक्षेसाठी भारताने पश्चिम सीमेवर एक स्क्वॉड्रन तैनात केले आहे. आता भारताकडे एस-400 हवाई संरक्षण प्रणाली असल्याने पाकिस्तान किंवा चीन सीमेवर कोणतेही नापाक कारवाया करू शकणार नाहीत. तसेच देशाची सुरक्षा अभेद्य होईल.

एस-400 क्षेपणास्त्र प्रणाली ही जगातील सर्वात सक्षम क्षेपणास्त्र प्रणाली मानली जाते. हे केवळ शस्त्र नसून एक शक्तिशाली वाहन आहे. त्यासमोर कोणाचेही षड्यंत्र चालणार नाही. ते आकाशातून हल्ला करते आणि हल्लेखोराचा नाश करते.  पाकिस्तान आणि चीन हे नेहमीच भारतासाठी आव्हान राहिले आहेत. भारताने या देशांशी युद्धे लढली आहेत. सत्तेचा समतोल राखण्यासाठी देशाला अशा क्षेपणास्त्र यंत्रणेची आवश्यकता होती. भारताला एस-400 प्रणाली मिळाल्याने भारतीय हवाई दलाची ताकद वाढेल.

Advertisement
Tags :

.