महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

आसाममध्ये चकमकीत 3 उग्रवाद्यांचा खात्मा

06:13 AM Jul 18, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

चकमकीत 3 पोलीस कर्मचारी जखमी

Advertisement

वृत्तसंस्था/ सिल्चर

Advertisement

आसामच्या कछार जिल्ह्यात बुधवारी झालेल्या चकमकीत कमीत कमी तीन उग्रवादी मारले गेले आहेत. तर चकमकीत अनेक पोलीस जखमी झाले असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. याप्रकरणी अद्याप कछार जिल्हा पोलिसांकडून अहवाल मिळाला नसल्याने विस्तृत माहिती देता येत असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले आहे.

तर पोलिसांनी मंगळवारी रात्री पूर्व धोलाई गंगानगर येथून तीन उग्रवाद्यांना अटक केली होती. या उग्रवाद्यांच्या संघटनेविषयी अद्याप माहिती देण्यात आलेली नाही. हे उग्रवादी एका रिक्षेतून प्रवास करत होते, या रिक्षेतून एके-47 रायफल, पिस्तुल आणि अन्य शस्त्रास्त्रs जप्त करण्यात आली आहेत. अटक करण्यात आलेल्या उग्रवाद्यांनी चौकशीदरम्यान दिलेल्या माहितीच्या आधारावर पोलिसांच्या एका पथकाने बुधवारी मोहीम राबविली, या शोधमोहिमेदरम्यान उग्रवाद्यांसोबत चकमक झाली आहे. एक तासाहून अधिक काळापर्यंत चाललेल्या चकमकीत तीन उग्रवादी मारले गेले, तर तीन पोलीस गोळी लागल्याने जखमी झाले आहेत. सर्व जखमींना उपचारासाठी सिलचर वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article