कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

भारत-इंग्लंड मालिकेत 21 शतके, 7187 धावा !

06:59 AM Aug 06, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

कसोटी इतिहासाच्या मालिकेतील दुसरी सर्वोच्च धावसंख्या : दोन्ही संघांकडून धावांचा पाऊस

Advertisement

लंडन/ वृत्तसंस्था

Advertisement

सोमवारी ओव्हल येथे झालेल्या पाचव्या आणि शेवटच्या कसोटी सामन्यात भारताच्या वेगवान गोलंदाजांनी दमदार कामगिरी केल्यामुळे इंग्लंडवर सहा धावांनी रोमांचक विजय मिळवण्यात मदत झाली. शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील भारताला लॉर्ड्सवरील तिसऱ्या कसोटी सामन्यात 22 धावांनी पराभव पत्करावा लागला होता. मँचेस्टर कसोटीत अखेरच्या दिवशी इंग्लंडच्या गोलंदाजांना समर्थपणे मुकाबला करीत सामना अनिर्णीत राखण्यात यश मिळविले. आणि त्यानंतर शेवटच्या कसोटीत विजय मिळवून मालिका 2-2 अशी बरोबरीत सोडविली.

बहुतेक पाटा खेळपट्ट्यांवर खेळल्या गेलेल्या या मालिकेत दोन्ही संघांच्या फलंदाजांनी अक्षरश: 7,187 धावांचा पाऊस पाडला. ही कसोटी इतिहासाच्या मालिकेतील दुसरी सर्वोच्च धावसंख्या आहे. फलंदाजांच्या आक्रमक खेळाच्या जोरावर दोन्ही संघांनी या मालिकेत एकूण 14 वेळा 300 किंवा त्याहून अधिक धावा केल्या आणि एका कसोटी मालिकेत सर्वाधिक 300 पेक्षा जास्त धावा काढण्याच्या विक्रमाची बरोबरी केली. या मालिकेत नऊ खेळाडूंनी 400 किंवा त्याहून अधिक धावा केल्या. यामुळे वरच्या आणि मधल्या फळीतील खेळाडूंचे सातत्य आणि लवचिकता अधोरेखित झाली.

शुभमन गिलने 754 धावा करून सर्वाधिक धावा जमणाऱ्यांत अव्वल स्थान पटकावले. यामध्ये कारकिर्दीतील सर्वोत्तम 269 धावांसह चार शतकांचा समावेश आहे. जो रुट (537), केएल राहुल (532) आणि रवींद्र जडेजा (516) यांनीही 500 धावांचा टप्पा ओलांडला. या मालिकेत 50 अर्धशतके आणि त्याहून अधिक धावा केल्या गेल्या आहेत. त्यात भर म्हणून दोन्ही संघातील खेळाडूंनी पाच कसोटींमध्ये 21 शतके झळकवली आहेत. ही कसोटीच्या इतिहासातील एकाच मालिकेत आतापर्यंतची सर्वाधिक शतके आहेत.

पाचव्या कसोटीत जो रुटने हॅरी ब्रूकसोबत मिळून 195 धावांची भागीदारी केली. 2018 मध्ये ओव्हल येथे केएल राहुल आणि ऋषभ पंत यांच्या 204 धावांच्या भागीदारीनंतर, चौथ्या डावात पराभव पत्करताना ही दुसरी सर्वोच्च भागीदारी होती. कसोटी इतिहासात चौथ्या डावात फक्त तीन विकेट्स गमावून 300 पेक्षा जास्त धावा केल्यानंतरही संघ पराभूत होण्याची ही तिसरी वेळ होती.

याआधीच्या दोन घटनांमध्ये 1978- 79 मध्ये ऑस्ट्रेलियाचा पाकिस्तानविऊद्ध 305/3 वरून 310 धावांवर डाव आटोपल्याने पराभव झाला आणि 2007-08 मध्ये वेस्ट इंडिजचा ऑस्ट्रेलियाविऊद्ध 475 धावांचा पाठलाग करताना 303/3 वरून 387 धावांवर डाव संपल्यानंतर त्यांचा पराभव झाला होता. इंग्लंडने 332/4 वरून 367 धावांवर डाव आटोपल्याने पराभव पत्करला आणि अपयशी ठरलेल्या धावसंख्येचा पाठलाग करताना सर्वाधिक चार विकेट गमावण्याच्या यादीत त्यांना दुसऱ्या क्रमांकावर आणले.

ओव्हल येथे भारताचा मालिका बरोबरीत आणणारा विजय हा केवळ कठीण संघर्षाचा निकाल नव्हता, तर तो ऐतिहासिक होता. सहा धावांनी मिळालेला विजय धावांच्या बाबतीत भारताचा कसोटी क्रिकेटमधील सर्वात कमी धावांचा विजय ठरला. 2004-05 च्या हंगामात मुंबईत ऑस्ट्रेलियावर 13 धावांनी मिळालेला विजय मागे टाकला. ओव्हल कसोटी ही भारताची पहिलीच वेळ होती जेव्हा भारताने विदेशी मालिकेतील पाचवी किंवा सहावी कसोटी जिंकली. त्यांना हे यश मिळवण्यासाठी 17 वेळा प्रयत्न करावे लागले. परदेशात सहावी कसोटी खेळण्याचा त्यांचा दुसरा एकमेव अनुभव 1982-83 मध्ये कराची येथे होता आणि तो अनिर्णित राहिला होता.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article