रणजी सामन्यात अजिंक्य रहाणेचे शतक
06:30 AM Feb 18, 2022 IST
|
Tarun Bharat Portal
Advertisement
अहमदाबाद : 2022 च्या रणजी क्रिकेट हंगामातील येथे सुरू झालेल्या मुंबई आणि सौराष्ट्र यांच्यातील सामन्यात भारतीय कसोटी संघाचा माजी कर्णधार अजिंक्य रहाणेने शानदार शतक झळकविले.
Advertisement
गेल्या काही दिवसांपासून अजिंक्य रहाणे फलंदाजीचा सूर मिळविण्यासाठी झगडत होता. या सामन्यात खेळताना मुंबई संघाकडून अजिंक्य रहाणेने 212 चेंडूत शतक झळकविले. मुंबईची स्थिती एकवेळ 2 बाद 22 अशी केविलवाणी असताना रहाणेने मैदानात प्रवेश करून संघाचा डाव सावरला. रहाणे आणि सर्फराज खान यांनी मुंबईचा डाव सावरला. सर्फराज खानने 85 धावा जमविल्या. मुंबईने 3 बाद 263 धावांपर्यंत मजल मारली आहे.
Advertisement
Advertisement