For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कायदा-सुव्यवस्थेसह कलम ३९एवर तातडीने चर्चा घ्या : विरोधी पक्षनेते युरी आलेमाव

12:24 PM Aug 31, 2026 IST | Tarun Bharat Portal
कायदा सुव्यवस्थेसह कलम ३९एवर तातडीने चर्चा घ्या   विरोधी पक्षनेते युरी आलेमाव
Advertisement

पणजी : विधानसभा अधिवेशनातील गोंधळाच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी राज्यातील कायदा व सुव्यवस्था, वाढती गुन्हेगारी, जमिनींचे बेकायदेशीर रूपांतरण तसेच टाऊन अँड कंट्री प्लॅनिंग कायद्यातील कलम ३९ए रद्द करण्याच्या मागणीवर तातडीने सविस्तर चर्चा घेण्याची मागणी केली आहे.

Advertisement

राज्यातील जनतेशी संबंधित महत्त्वाच्या प्रश्नांवर विधानसभेत सखोल चर्चा होणे आवश्यक असल्याचे आलेमाव यांनी म्हटले. विशेषतः जमिनींच्या बेकायदेशीर रूपांतरणामुळे निर्माण होणाऱ्या समस्या, नियोजन कायद्यातील तरतुदी आणि त्याचा सामान्य नागरिकांवर होणारा परिणाम याबाबत सरकारने आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी त्यांनी केली.

दरम्यान, राज्यातील बिघडलेली कायदा व सुव्यवस्था आणि वाढती गुन्हेगारी याबाबतही त्यांनी चिंता व्यक्त केली. नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर असून, या विषयावर सरकारकडून ठोस उपाययोजनांची माहिती विधानसभेत देणे गरजेचे असल्याचे आलेमाव यांनी सांगितले.

Advertisement

अधिवेशनादरम्यान विविध मुद्द्यांवरून गोंधळाचे वातावरण निर्माण झाले असले, तरी जनतेच्या मूलभूत प्रश्नांवर चर्चा होणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे संबंधित विषयांवर तातडीने सविस्तर चर्चा घ्यावी, अशी मागणी विरोधी पक्षनेत्यांनी केली आहे.

Advertisement
Tags :

.