महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

युवा भारत होऊ लागलाय वृद्ध

06:28 AM Sep 28, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

सरासरी वय 24 वरून वाढत झाले 29 वर्षे : 1951 नंतर वृद्धीदर सर्वात कमी

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

भारत युवा लोकसंख्येचा देश आहे. पूर्ण जगात भारत चौथ्या क्रमांकाचा सर्वात युवा देश मानला जातो. या यादीत पहिल्या क्रमांकावर आफ्रिकन देश नायजेरिया आहे. दुसरा क्रमांक फिलिपाईन्स तर तिसरा क्रमांक बांगलादेशचा आहे. 140 कोटीची लोकसंख्या असलेल्या देशात युवांच्या वर्कफोर्समुळे भारताचे महत्त्व वाढले आहे. तर याचदरम्यान एका नव्या अहवालाने सर्वांच्या चिंता वाढविल्या आहेत. भारतात युवा लोकसंख्येचे सरासरी वय यापूर्वी 24 होते, जे आता वाढून 29 वर्षे झाले आहे. हे पाहता युवांची संख्या घटत आहे. 2024 मध्ये देशाच्या लोकसंख्येचा वृद्धी दर 1 टक्क्यांवर पोहोचला आहे, जो 1951 नंतरचा सर्वात कमी आहे. 1951 मध्ये हा दर 1.25 टक्के होता. 1972 मध्ये हा सर्वाधिक म्हणजेच 2.2 टक्के होता. 2021 मध्ये वृद्धांच्या संख्येतील वृद्धीदर 1.63 टक्के राहिला होता. वृद्धांची संख्या वाढत असल्याचा अनुमान एसबीआयने स्वत:च्या नव्या संशोधन अहवालात व्यक्त केला आहे.

वृद्धांच्या संख्येत वेगाने वाढ

या आव्हानांवर काम करणे आवश्यक

वृद्धांमध्ये मधुमेह, हृदयविकार आणि मानसिक आरोग्य समस्यांचे प्रमाण अधिक असते. या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी सरकार आणि सामाजिक संघटनांसोबत मिळून काम करण्याची गरज असल्याचे सर्वेक्षण अहवालात म्हटले गेले आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article