For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भाडेतत्वावर बुक करता येतो साथीदार

06:02 AM Jun 27, 2026 IST | Tarun Bharat Portal
भाडेतत्वावर बुक करता येतो साथीदार
Advertisement

सध्याच्या भरधाव जीवनात लोक पैशांनी श्रीमंत होत आहेत, परंतु नाते अन् आपलेपणापासून दूर जात आहेत. मोठ्या शहरांच्या झगमगाटादरम्यान अनेक लोकांकडे चांगली नोकरी, पैसे आणि सुविधा आहेत, परंतु सोबत बसून बोलणारे कुणीच नाही. याचमुळे आता एकटेपणावरील उपाय आता मोठा बिझनेस ठरत  आहे. चीनमध्ये आता लोक मैत्री आणि साथ देणारा साथीदार भाडेतत्वावर बुक करत आहेत.

Advertisement

चीनमध्ये वेगाने बदलणारे लाइफस्टाइल आणि कामाच्या वाढत्या दबावाने लोकांना भावनिक रुपाने अत्यंत एकाकी केले आहे. तेथील अनेक युवा आता विवाह आणि नात्यांपासून अंतर राखत आहेत. लोक अनेक तास ऑफिसमध्ये काम करतात आणि त्यांच्याकडे परिवार किंवा मित्रांसाठी वेळच राहत नाही. अशास्थितीत आता एक नवा ट्रेंड वेगाने वाढत आहे, ज्याला ‘कम्पॅनियनशिप इकोनॉमी“ म्हटले जात आहे.

या ट्रेंडच्या अंतर्गत लोक पैसे देऊन अशा साथीदाराला बुक करत आहेत, जो त्यांच्यासोबत फिरेल, जेवेल, चित्रपट पाहिल आणि केवळ संभाषण करेल. हे नाते प्रेम किंवा विवाहासारखे नसते, तर काही तासांसाठी पार पाडण्यासारखे असते.

Advertisement

भाडेतत्वावर मिळत आहेत मित्र

चीनमध्ये अनेक ऑनलाइन प्लॅटफॉर्म अशा लोकांना जोडत आहेत, ज्यांना साथ हवी असून ती पैसे देऊ मिळविण्यास तयार आहेत. कुणी शॉपिंगवर सोबत घेऊन जातो, तर कुणी कॉफी पिणे, तर काही जण एकट्याने प्रवास न करण्यासाठी साथीदार बुक करतात. हे केवळ युवांपुरती मर्यादित नाही, अनेक वृद्ध लोक देखील एकाकीपणा टाळण्यासाठी अशाप्रकारच्या सेवांचा वापर करत आहेत.

वेगाने वाढतोय व्यवसाय

चीनमध्ये हा बिझनेस आता हजारो कोटी रुपयांपर्यंत पोहोचला आहे. अनेक छोट्या कंपन्या काही वर्षांमध्ये मोठ्या झाल्या आहेत. काही स्टार्टअप्समध्ये कर्मचाऱ्यांची संख्या 10 वरून वाढत शेकडेंमध्ये पोहोचली आहे. यातून लोकांदरम्यान भावनिक जुळलेपणाची गरज किती वेगाने वाढतेय हे स्पष्ट आहे. पूर्वी लोक सोशल मीडियावर मित्र शोधायचे, परंतु आता लोक खऱ्या जीवनात कुणाची साथ इच्छितात, भले मग त्यासाठी पैसे का द्यावे लागू नयेत.

एकाकीपणा वाढतोय

मोठ्या शहरांमधील जीवनात लोक हळूहळू एकटे पडत आहेत. सोशल मीडियावर हजारो मित्र असूनही खऱ्या आयुष्यात लोकांकडे बोलणारा कुणी नसतो. याचमुळे आता लोक पैशांसोबत साथ खरेदी करण्यास तयार आहेत. परंतु काही लोक याला काळाची गरज मानत आहेत, तर काही जण याला समाजासाठी चिंतेचा विषय ठरवत आहेत.

Advertisement
Tags :

.