5 टी-20 सामन्यांसाठी महिला संघ बांगलादेश दौऱ्यावर
06:30 AM Apr 04, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
वृत्तसंस्था/ ढाका
Advertisement
या महिन्याच्या अखेरीस भारताचा महिला क्रिकेट संघ बांगलादेशच्या दौऱ्यावर जाणार असून या दौऱ्यात पाच टी-20 सामन्यांची मालिका उभय संघांत होणार आहे. 28 एप्रिल ते 9 मे या कालावधीत ही मालिका होईल.
बांगलादेश क्रिकेट मंडळाने दिलेल्या वेळापत्रकानुसार भारतीय महिला संघ 23 एप्रिल रोजी बांगलादेशमध्ये दाखल होईल आणि 10 मे रोजी मायदेशी प्रयाण करेल. या मालिकेतील पहिला सामना 28 एप्रिल रोजी होईल 30 एप्रिल रोजी दुसरा सामना दिवस-रात्रीचा खेळविण्यात येईल. त्यानंतरचे सामने 2, 6 व 9 मे रोजी खेळविले जातील. यातील शेवटचा सामना डे-नाईट सामना असेल. मालिकेतील सर्व सामने सिल्हेतमध्ये खेळविले जातील.
Advertisement
Advertisement