For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भारती एअरटेलची सुत्रे पुढच्या पिढीकडे?

07:00 AM May 15, 2026 IST | Tarun Bharat Portal
भारती एअरटेलची सुत्रे पुढच्या पिढीकडे
Advertisement

सुनील मित्तल उत्तराधिकार योजना जाहीर करण्याच्या तयारीत

Advertisement

वृत्तसंस्था/नवी दिल्ली

भारती एअरटेलचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक सुनील भारती मित्तल यांनी गुरुवारी आपली उत्तराधिकार योजना जाहीर केली आणि सांगितले की, त्यांना पुढील 10 वर्षांत कंपनीची सूत्रे पुढच्या पिढीकडे सोपवायची आहेत. कंपनीच्या बैठकीदरम्यान ते म्हणाले ‘मला पुढच्या 10 वर्षांत नेतृत्व पुढच्या पिढीकडे सोपवायचे आहे.’ त्यांनी असेही सांगितले की, मध्य पूर्वेतील सुरू असलेल्या युद्धामुळे कंपनीच्या व्यवसायावर अनेक आघाड्यांवर परिणाम झाला आहे.

Advertisement

यापूर्वी बुधवारी, सुनील भारती मित्तल यांची भारती एअरटेलच्या अध्यक्षपदी पाच वर्षांच्या पुढील कालावधीसाठी पुन्हा नियुक्ती करण्यात आली. हा कार्यकाळ 1 ऑक्टोबर 2026 पासून प्रभावी होईल, मात्र यासाठी भागधारकांची मंजुरी आवश्यक असेल. सुनील भारती मित्तल यांनी भारती एंटरप्रायझेसची स्थापना केली आणि 1995 मध्ये दिल्लीत एअरटेल मोबाईल सेवा सुरू केली. सध्या ते कंपनीत कार्यकारी अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत.

एअरटेलचे लक्ष एआरपीयू वाढवण्यावर

सुनील भारती मित्तल म्हणाले की, भारती एअरटेल आगामी काळात प्रति वापरकर्ता सरासरी महसूल वाढवण्यावर अधिक लक्ष केंद्रित करेल. एआरपीयू म्हणजे कंपनीला प्रत्येक ग्राहकाकडून मिळणारा सरासरी महसूल होय. मित्तल यांनी कबूल केले की चौथ्या तिमाहीतील आकडेवारी अपेक्षेप्रमाणे नव्हती, त्यामुळे कंपनी आता या दिशेने पुढे काम करेल. एअरटेलच्या भारतीय मोबाईल सेवा व्यवसायाने आर्थिक वर्ष 2025-26 च्या चौथ्या तिमाहीत 28,831 कोटी रुपयांचा महसूल मिळवला. हा गेल्या वर्षीच्या तुलनेत सुमारे 8 टक्के अधिक आहे. कंपनीच्या महसुलातील वाढीचे मुख्य कारण म्हणजे ग्राहकांच्या संख्येत झालेली वाढ आणि एआरपीयूमध्ये झालेली सुधारणा. एअरटेलचा एआरपीयू पूर्वीच्या 245 रुपयांवरून 257 रुपयांपर्यंत वाढला. कंपनीने नियामक फाइलिंगमध्ये म्हटले आहे की, सुधारित प्राप्ती आणि मजबूत ग्राहक आधारामुळे त्यांच्या भारतीय मोबाईल व्यवसायाचा महसूल वार्षिक 8.3 टक्क्यांनी वाढला आहे.

ग्राहक संख्येत सातत्यपूर्ण वाढ

मार्च 2026 मध्ये, भारती एअरटेलने 65 कोटी ग्राहकांचा टप्पा ओलांडला. यासह, एअरटेल ग्राहक संख्येच्या बाबतीत जगातील दुसरी सर्वात मोठी दूरसंचार कंपनी बनली आहे. हा पराक्रम करणारी ही भारतातील पहिली दूरसंचार कंपनी देखील आहे. चौथ्या तिमाहीत कंपनीची भारतातील उलाढाल 8 टक्क्यांनी वाढून 39,565.6 कोटी रुपयांवर पोहोचली.

Advertisement
Tags :

.