For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Uddhav Thackeray: 6 खासदारांनी उद्धव ठाकरेंची साथ का सोडली? या कारणामुळे शिवसेनेत मोठी फुट पडली

04:04 PM Jun 18, 2026 IST | NEETA POTDAR
uddhav thackeray  6 खासदारांनी उद्धव ठाकरेंची साथ का सोडली  या कारणामुळे शिवसेनेत मोठी फुट पडली
Advertisement

मुंबई - गेले बऱ्याच दिवसांपासुन 6 खासदारांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडणार असल्याच्या बातम्या सुरु होत्या अखेर त्याला पुर्णविराम मिळाला आहे.... ठाकरेंच्या शिवसेनेतील 6 खासदारांनी ठाकरेंना राम राम ठोकत साथ सोडली आहे... काही दिवसांपुर्वी ऑपरेशन टायगरची चर्चा सुरु होती...ऑपरेशन टायगर अंतर्गत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे या खासदारांच्या संपर्कात होते आणि ते लवकरच शिंदे गटात प्रवेश करतील असं बोललं जात होतं...

Advertisement

यासाठी ठाकरे प्रमुख उद्धव ठाकरें यांनी या संदर्भात 13 खासदारांची मिंटींग बोलवली होती. या मिंटींगमध्ये 13 मधील 6 खासदार हजर नसल्याने या चर्चांना दुजोरा मिळाला आहे... त्यामुळे आता ठाकरे शिवसेना अॅक्शनमोडवर आली आहे... या खासदारांवर शिवसेना ठाकरे गटाकडून लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहून अनुपस्थित राहिलेल्या 6 खासदारांवर कारवाई करण्याची मागणी केली जाणार आहे... अशी माहिती समोर येत आहे....पक्षातील ६ खासदारांचा बंडखोरी ही उध्दव ठाकरे यांना मोठा धक्का मानला जात आहे...

काय आहे नेमके कारणं..?

Advertisement

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील ६ या बंडखोर खासदारांनी पक्ष सोडण्यापूर्वी एक विशेष ठराव मंजूर केला असून, त्यामध्ये त्यांनी आपली भूमिका अत्यंत स्पष्टपणे मांडली आहे. या ठरावात सर्वात मोठा दावा शिवसेना आणि काँग्रेस यांच्यातील वाढत्या जवळकीबाबत करण्यात आला आहे. खासदार संजय राऊत यांनी काही दिवसांपूर्वी तृणमूल काँग्रेसला काँग्रेसमध्ये विलीन होण्याचा सल्ला दिला होता. याच विधानाचा संदर्भ घेत, भविष्यात 'शिवसेना ठाकरे गट' देखील काँग्रेस पक्षामध्ये पूर्णपणे विलीन केला जाऊ शकतो, अशी तीव्र भीती या बंडखोर खासदारांनी आपल्या ठरावात व्यक्त केली आहे. पक्षाच्या या संभाव्य विलीनीकरणाच्या भीतीसोबतच, सध्याचा ठाकरे गट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मूळ 'हिंदुत्ववादी विचारसरणी' आणि सिद्धांतांपासून पूर्णपणे भरकटला आहे, असा गंभीर आरोपही या खासदारांनी केला आहे.

ज्या काँग्रेस विचारसरणीच्या विरोधात शिवसेनेची स्थापना झाली होती, त्याच काँग्रेसमध्ये पक्षाचे अस्तित्व विलीन होणे आपल्याला मान्य नाही, असे सांगत पक्ष नेतृत्वावरील तीव्र अविश्वासामुळेच आम्ही ही वेगळी वाट धरत असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. या संपूर्ण घडामोडीत सर्वात महत्त्वाची आणि तांत्रिक बाब म्हणजे, प्रसारमाध्यमांमध्ये जरी या ६ खासदारांना 'स्वतंत्र गट' म्हणून संबोधले जात असले, तरी कायदेशीररित्या त्यांनी स्वतःला स्वतंत्र ठेवलेले नाही. त्यांनी मंजूर केलेल्या मूळ ठरावानुसार, त्यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील 'शिवसेना' पक्षात विलीन होण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे हा केवळ अंतर्गत वाद नसून, खासदारांनी थेट मूळ पक्षात प्रवेश करत उद्धव ठाकरे यांना एक मोठा राजकीय धक्का दिला आहे.

Advertisement
Tags :

.