For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

माओवाद्यांसंबंधात नवा विवाद कोणाला भोवणार?

07:00 AM Apr 19, 2024 IST | Tarun Bharat Portal
माओवाद्यांसंबंधात नवा विवाद कोणाला भोवणार
Advertisement
  • बुधवारी, अर्थात 17 एप्रिलला छत्तीसगडमध्ये सुरक्षा सैनिकांनी 23 माओवादी हिंसाचाऱ्यांना कंठस्नान घातले आहे. जीव गमावलेले हे माओवादी ‘हुतात्मे’ आहेत, अशी प्रतिक्रिया काँग्रेसच्या प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांनी व्यक्त केल्याने मोठाच वाद निर्माण झाला आहे. काँग्रेसची ही प्रतिक्रिया त्या पक्षाचे खरे रुप उघड करते, असा प्रतिवार करताना, एका प्रसंगाची आठवण भारतीय जनता पक्षाने करुन दिली आहे. ही आठवण अत्यंत विदारक अशीच असल्याचे स्पष्ट दिसून येते.
  • 2008 मध्ये याच माओवाद्यांनी काँग्रेसच्या 22 नेत्यांची एकाच वेळी गोळ्या घालून हत्या केली होती. त्यावेळी काँग्रेसला हे माओवादी देशद्रोही वाटले होते. आपल्याच प्रमुख नेत्यांची माओवाद्यांनी केलेली हत्या काँग्रेस विसरली काय, असा प्रश्न केवळ भारतीय जनता पक्षच नव्हे, तर अन्य राजकीय जाणकारही विचारत आहेत. या प्रश्नाचे उत्तर देणे काँग्रेसला कठीण जाणार हे निश्चित आहे. काँग्रेस सत्तेवर असताना माओवाद्यांच्या अशाच हत्या झाल्या होत्या, हेही सत्यच आहे.
Advertisement
Advertisement
Tags :

.