बरे झाले, पाकला धडा शिकवला
‘इसका जवाब मिलेगा, बराबर मिलेगा आतंकवादीयोकी सोच से बडा करारी जवाब मिलेगा’ असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहलगाममध्ये 26 पर्यटकांवर धर्म विचारुन गोळीबार झाल्यावर म्हटले होते. मोदी दु:ख आणि संताप यामुळे कडवट, कठोर दिसत होते. मंगळवारी मध्यरात्रीनंतर त्यांनी शत्रूला बेसावध ठेवत पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानमध्ये घुसून नऊ दहशतवादी तळ बेचिराख केले. यामध्ये अनेक दहशतवादी ठार झाले. पहलगाम हल्ल्यामागील सुत्रधार आणि संसदेवर हल्ला व भारत विरोधी अनेक कट रचणाऱ्या मसूद अझरच्या कुटुंबाचा खात्मा झाला. हा मसूद जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा प्रमुख आहे. आपले आप्त मेलेले बघून आपणही मेलो असतो तर बरे झाले असते असे त्याने म्हटले आहे. पण त्याची इच्छा लवकरच पूरी होईल. त्याचे दहा कुटुंबीय या हवाई हल्ल्यात मारले गेले आहेत, चार ते सहाजण जखमी आहेत. मुंबई हल्ल्यातील अजमल कसाब याला प्रशिक्षण देणारा तळही या हवाई स्ट्राईकमध्ये भूईसपाट झाला आहे. या हल्ल्यात मसूदचा भाऊ भारताचा मोष्ट वाँटेड अब्दुलरौफ अझर गंभीर जखमी झाला आहे. त्याचा मुलगा हुजैय्या ठार झाला आहे. या हल्ल्यात अतिरेक्यांचा शस्त्रसाठा, प्रशिक्षण केंद्रे व दहशतअ•s बेचिराख झाले आहेत. साहजिकच भारतभर आणि विश्वभर समाधानाची, आनंदाची लहर निर्माण झाली आहे. पहलगाममध्ये ज्या चार जणांनी सव्वीस पर्यटकांना धर्म विचारुन गोळ्या घातल्या या सव्वीस जणांच्या बायकांचे त्यांच्यासमोर कुंकू पुसले या रागातून या मोहिमेला ‘ऑपरेशन सिंदूर’ असे भावनिक नाव देण्यात आले होते. ही मोहीम फत्ते करुन भारतीय सैन्याच्या इतिहासात, शिरपेचात विजयाचे एक नवे मोरपीस विराजमान झाले. भारत बदलला आहे. तो चोख प्रत्युत्तर देतो हे पुन्हा एकदा दिसून आले आहे. भारताने जगापुढे पाकिस्तानला उघडे पाडले आहे. पाकिस्तान केवळ भारताचा शत्रू नाही तर दहशतवादाचा पोशिंदा आहे, हे सर्वांच्या लक्षात आणून दिले होते. भारताने वारंवार निर्देश देऊनही पाकिस्तानने दहशतवादी किंवा दहशतवाद यावर कोणतेच पाऊल उचलले नव्हते आणि पहलगाम हल्ल्यानंतर भारत घुसून मारणार बदला घेणार यांची सर्वांनाच कल्पना आली होती. पंतप्रधान, गृहमंत्री, संरक्षणमंत्री हे छत्रपती शिवरायांचे भक्त आणि अनुयायी आहेत, त्यांनी शत्रूची चौफेर कोंडी केली. गनिमीकावा केला. प्रसंगात कोण मित्र, कोण शत्रू हे तपासले आणि देशभर मॉकड्रील व ब्लॅक आऊटची हवा केली. पंतप्रधान निवडणूक प्रचारात आणि सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी होत होते. जोडीला तिन्ही दलाच्या बैठका घेत होते. सिंधू करार संपला म्हणत त्यांनी भिकेकंगाल पाकिस्तानची दयनीय अवस्था केली. काहींना वाटले हाच बदला तर जगभरात पाकची झालेली कोंडी बघून काहींना वाटले धडा शिकवला पण मोदींनी घुसके मारुंगा म्हटले होते. आणि ते शब्द खरे करत त्यांनी पाकिस्तान पोसत असलेले नऊ दहशतवादी अ•s आणि हजारभर दहशतवादी मारले आणि सणसणीत तडाखा दिला. या सिंदूर मोहिमेसाठी भारताने राफेल विमाने, स्कॅल्प क्षेपणास्त्रs,
हॅमर बॉम्ब वापरले असा अंदाज व्यक्त होतो आहे. अचूक वेळ, अचूक लक्ष आणि आंतरराष्ट्रीय नियमांचे पालन हे या सिंदूर मोहिमेचे वैशिष्ट्या होते. ऑपरेशन सिंदूरच्या यशस्वी मोहिमेसाठी भारताने वापरलेली आयुधे आधुनिक आहेत आणि राफेल लिंबू मिरच्या बांधून आयात केलेले असले तरी ते योग्य वेळी तडाखा देते व ते त्यासाठी वापरले जाते हे अधोरेखित झाले आहे. एव्हढ्या औषधाने पाकिस्तान आणि तोयबा, जैश वगैरे अतिरेकी संघटना गार पडतात का हा प्रश्नच आहे. भारताने आजवर पाकड्यांना अनेकवेळा धुळ चारली आहे पण त्यांची वृत्ती बदलत नाही. मोदी व भारतीय लष्कर या मोहिमेनंतर पूर्ण समाधानी आहे का हेही बघावे लागेल. या कारवाईनंतर सव्वीस जणांच्या हत्त्येला योग्य श्रध्दांजली वाहिली गेली असा सर्वदूर भाव आहे. या सव्वीस जणांच्या कुटुंबीयांच्या भावना, प्रतिक्रिया बोलक्या आहेत. या धड्यानंतर पाकिस्तान आणि अतिरेकी संघटना व संबंधित योग्य बोध घेतीलच पण ती न घेता काही पाकने आणि दहशतवाद्यांनी कागाळी केलीच तर भारत त्यांचे पुरते कंबरडे मोडणार हे वेगळे सांगायला नको. पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी भारताच्या कारवाईबद्दल संताप व्यक्त केला आहे. भारताचा हल्ला म्हणजे युद्धाची खुली कारवाई असल्याचं शरीफ म्हणाले. आमच्या देशाला प्रत्युत्तर देण्याचा पूर्ण अधिकार असल्याचंही त्यांनी म्हटलं. पण या त्यांच्या केवळ वल्गना आहेत. भारताच्या एअर स्ट्राईकनंतर पाकिस्ताननं जम्मू-काश्मीरच्या नियंत्रण रेषेवर आणि आंतरराष्ट्रीय सीमेवर बेछूट गोळीबार सुरु केला होता. या अंदाधुंद गोळीबार हल्ल्यात 10 भारतीय नागरिकांचा मृत्यू झाला तर 48 जखमी झाल्याची माहिती आली आहे. भारतीय लष्कराकडून या गोळीबाराला प्रत्युत्तर दिलं जात आहे. भिकेकंगाल पाकिस्तान घाबरला आहे. कुवत नाही, कुणाचा पाठिंबा नाही. सर्वदूर बेईज्जत आहे आणि यादवी आहे असा पाकिस्तान बेताल बडबड करत आहे. तो बडबड करुन गप्प गार पडेल असा तर्क आहे पण काही कागळीक केलीच तर पाकिस्तानची पूरती वाट लागेल हे सुनिश्चित आहे. मोदींनी आणि भारतीय सैन्याने मंगळवारी मध्यरात्रीनंतर दिलेला धडा स्वल्पविराम आहे की पूर्णविराम हे लवकरच स्पष्ट होईल. पण दहशतवाद, दहशतवादी संघटना आणि त्यांना पाठिंबा देणाऱ्या पाकिस्तानसारख्या देशांची खैर नाही हे स्पष्ट झाले आहे. दहशतवाद्यांचे मुख्यालय आणि कॅम्प उद्ध्वस्त झाले आहेत. या हल्ल्यानंतर भारताचे माजी लष्कर प्रमुख मनोज नरवणे यांनी सोशल मीडियावर ‘ये तो ट्रेलर है’ अशी पोस्ट टाकली, ज्यामुळे सस्पेन्स आणखी वाढला आहे. भारत पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणार का? पाकिस्तानचे आणखी तुकडे पडणार का? आणि काश्मीर खोऱ्यातील पाणी हे शस्त्र बनवून भारत शत्रूला संपवणार का? आदी प्रश्नांची उत्तरे मिळायला काही काळ वाट पहावी लागेल. तूर्त पाकिस्तान आणि दहशतवादी संघटनांना योग्य धडा शिकवला गेला आहे आणि भारताचा तिरंगा उंचावला गेला आहे.