For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

काळम्मावाडी धरणातून पाणी गळती वाढली

01:00 PM Dec 12, 2024 IST | Pooja Marathe
काळम्मावाडी धरणातून पाणी गळती वाढली
Water leakage from Kalammawadi dam has increased
Advertisement

कोल्हापूरः

Advertisement

जिल्ह्यातील सर्वांत मोठे धरण असलेल्या काळम्मावाडी (दूधगंगा) धरणातून पाणी गळती वाढली आहे. प्रतिसेकंद 350 लिटर वरून 700ते 800 मीटर पाण्याची गळती सुरू असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. जिल्ह्यातील राधानगरी, करवीर, हातकणंगले, शिरोळ, कागल आणि भुदरगड तालुक्यांतील १२१ गावांमधील ४६ हजार ९४८ हेक्टर क्षेत्राला काळम्मावाडी धरणातून पाणीपुरवठा होतो.

काळम्मावाडी धरणाची २५.३९ टीएमसी पाणीसाठ्याची क्षमता आहे. ही गळती काढण्यासाठी धरणाच्या काही भागात दुरुस्ती करण्यात येणार आहे. याकरिता राज्य सरकारने ८० कोटी रुपयांचा निधी ऑक्टोबर २०२३ मध्येच मंजूर केला. निधी मंजूर मात्र निविदा प्रक्रिया झाली नसल्यामुळे काम थांबून असल्याचेही सांगण्यात आले.

Advertisement

Advertisement
Tags :

.