उचगाव, बसुर्ते ‘जलशुद्धीकरण यंत्रणा’ बंद अवस्थेत
यंत्रणा बंद असल्यामुळे कोट्यावधी ऊपयांचा निधी वाया : मिळेल ते पाणी पिण्याची ग्रामस्थांवर वेळ : जनतेला शुद्ध पाण्याचा पुरवठा करणे आवश्यक
वार्ताहर /उचगाव
उचगाव, बसुर्ते गावांमध्ये शासनाच्या जलनिर्माण योजनेअंतर्गत बसविण्यात आलेल्या ‘जलशुद्धीकरण यंत्रणा’ नागरिकांना स्वच्छ पाणी मिळण्यासाठी राबविण्यात आली आहे. मात्र ती सुरू झाल्यापासून अवघ्या काही वर्षातच बंद अवस्थेत आहेत. चालूवषीचा उन्हाळा, पाणी मिळवण्यासाठी नागरिकांची चाललेली धडपड पाहता आणि पाणीटंचाई तसेच विहिरींनी गाठलेले तळ या सर्वांचा सारासार विचार करता नागरिकांना शुद्ध पाणी मिळण्यासाठी जलशुद्धीकरण यंत्रणेच्या माध्यमातून जनतेला शुद्ध पाण्याचा सुरळीत पुरवठा संबंधित खात्याने तातडीने करावा, अशी मागणी ग्रामस्थांतून करण्यात येत आहे. अनेक गावांमध्ये 2000 पासून जलनिर्माण योजना राबविण्यात आली आहे. मात्र ती सुरू झाल्यापासून व्यवस्थित पाणीपुरवठा होऊ शकला नाही. त्यामुळे कोट्यावधी ऊपयांचा निधी वाया गेला आणि नागरिकांना आजही आठ ते दहा दिवसातून पिण्याचे पाणी मिळत आहे. तसेच नागरिक जिथून मिळेल तिथून पिण्यासाठी पाण्याची जमवाजमवी करत असतात. अशा जंतूमिश्रित, गढूळ पाण्यापासून नागरिकांच्या आरोग्यालाही धोका निर्माण होऊ शकतो. आरोग्याचा प्रŽ सध्या जटील बनत चालला आहे. 2016 साली गावोगावी जलशुद्धीकरण यंत्रणा उभारण्यात आली आहे. पण या यंत्रणेत एखादा बिघाड झाला तर संबंधित खात्याने तातडीने दुऊस्ती करून सुरळीत पाणीपुरवठा करणे हे त्यांचे कर्तव्य आहे. मात्र संबंधित खात्याचे सातत्याने दुर्लक्ष झाल्यामुळे ही योजना कूचकामी ठरली आहे. जेव्हा प्रत्येक गावोगावी ही योजना राबविण्यात आली त्यावेळी एका यंत्राला सुमारे पाच लाख ऊपयांचा निधी पुरवण्यात आला होता. इतका मोठा खर्च शासनामार्फत करूनही तो सध्या वाया गेला आहे.
यंत्रणा केवळ शोभेची वस्तू
ग्रामीण जनतेला शुद्ध पाणी उपलब्ध करून देणारी ही योजना स्वागतार्ह आहे. परंतु ही यंत्रे बसविल्यानंतर काही महिनेच सुरळीत राहिली. त्यानंतर योग्य पद्धतीने हाताळणी झाली नसल्याने ती सध्या बंद पडली आहेत. त्याकडे कोणाचेच लक्ष नाही. तसेच काही समाजकंटकांनी या यंत्रणेची मोडतोड केल्याने ती बंद अवस्थेत असल्याने शोभेची वस्तू बनून राहिली आहे. यंत्रणा उभी केल्यानंतर त्याची माहिती मिळाल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांनी या ठिकाणी भेट देणे आवश्यक आहे. जेणेकरून हे यंत्र दीर्घकाळ सुस्थितीत व सक्षम राहील याबाबत ग्रामपंचायतीना माहिती देणे गरजेचे होते. यंत्र बसविण्यापेक्षा त्याची देखभाल महत्त्वाची आहे.
‘नियमित पाणी, विजेची गरज’
जलशुद्धीकरण यंत्रणा म्हणजेच रिव्हर्स आस्मोसिस व अल्ट्राव्हॉयलेट यंत्रणा आहे. त्यामध्ये उच्चदाबाने पाणी घालून बाहेर काढले जाते. त्यामुळे पाण्यात विरघळलेले घटक व रोगजंतू बाहेर पडतात. मात्र या यंत्राला नियमित पाणी व वीजपुरवठा लागतो. शुद्ध पाणी साठवून ठेवण्यासाठी वेगळी टाकी जोडली जाते. त्यानंतर यांत्रिक पद्धतीने सेन्सर बसवून ठरलेले नाणे यंत्रणेत टाकल्यास पाणी उपलब्ध केले जाते. काही गावाजवळ नैसर्गिक झरे आहेत त्याचे पाणी वर्षानुवर्षे लोक पिण्यास वापरतात. मात्र ते पिण्यायोग्य आहे का? त्यामध्ये अनावश्यक घटक कोणते व किती प्रमाणात आहेत, याची माहिती आरोग्य खाते देत नाही.
जंतूमिश्रित पाण्यामुळे धोका
शहरांमध्ये पुरविण्यात येणारे पाणी क्लोरीनेशन केलेले असते. विरघळलेले क्षार तसेच रोगजंतू बाहेर काढून ते नळाद्वारे पुरविले जाते. त्याचा टीडीएस (हार्डनेस) सुमारे 25 ते 30 पर्यंत असतो. तर थेट कूपनलिका, विहिरी व नदीचे पाणी उपसा करून ग्रामीण जनतेला पुरविले जाते. त्याचा टीडीएस सुमारे 280 ते 600 तर काही भागात 800 पर्यंत आहेत. जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार सर्वसाधारण अधिकाधिक दोनशे टीडीएस पाणी पिण्याची शारीरिक क्षमता आहे. सूक्ष्मजंतू (रोगजंतू) निर्देशांक झिरो किंवा शंभर मिलीमध्ये एकापेक्षा कमी असावा. विविध घटकमिश्रित गढूळ व जंतूमिश्रीत पाणी लोक पीत आहेत. यातून त्यांच्या आरोग्याचा प्रŽ सोडविण्यासाठी लघुजल शुद्धीकरण यंत्र बसवून पिण्याचे शुद्ध पाणी देणे गरजेचे आहे.
अशुद्ध पाण्यामुळे आरोग्याच्या तक्रारी वाढल्या
ग्रामीण भागात सध्या पुरविण्यात येणाऱ्या पिण्याच्या पाण्यामध्ये क्लोराईड फ्लोराईड हार्डनेस, लोह, नायटेट माती, विविध क्षार, आम्ल, विविध धातू तसेच रोगजंतू मिसळलेले आढळून आले आहेत. पिण्याच्या पाण्याची तपासणी केल्यानंतर हे सर्व दिसून येते. तरीही खेड्यापाड्यातील नागरिक पिण्यासाठी या पाण्याचा वापर करतात. मात्र शेतकरी वर्ग उन्हाळ्यात आपली तहान भागवण्यासाठी तालुक्मयातून वाहणारी मार्कंडेय नदी तसेच नाल्यातील वाहणारे पाणी मागचापुढचा विचार न करता पितात, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे ग्रामीण जनतेच्या आरोग्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. सध्या अनेक गावांमधून मुतखडा, पॅन्सर, हिवताप, डिसेंट्री असे अनेक आजार उद्भवत असून नागरिक त्याला बळी पडत आहेत.