For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आज मध्यरात्रीपासून देशात टोलदरात वाढ

06:45 AM Mar 31, 2026 IST | Tarun Bharat Portal
आज मध्यरात्रीपासून  देशात टोलदरात वाढ
Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

देशभरातील टोलनाक्यांवर 1 एप्रिलपासून नवीन नियम लागू होणार असल्यामुळे महामार्ग आणि द्रुतगती मार्गांवरील प्रवास अधिक महाग होणार आहे. 31 मार्चच्या मध्यरात्रीपासून महामार्गावर प्रवास करण्यासाठी वाहन मालकांना 5 ते 25 रुपयांपर्यंत वाढीव टोल शुल्क आकारले जाईल. याचा थेट परिणाम वाहनधारकांच्या खिशावर होईल. वाढीव टोल शुल्क वसुली लागू करण्यासाठी टोल व्यवस्थापनाने सर्व प्रणाली अद्ययावत केल्या आहेत. हे सुधारित शुल्क 1 एप्रिल रोजी 00:00 वाजता आणि 31 मार्च रोजी 11:59:59 वाजता लागू होईल. म्हणजेच नियोजित वेळेनुसार आज मध्यरात्रीपासूनच सुधारित शुल्क आकारण्यास सुरुवात होईल.

Advertisement
Advertisement
Tags :

.